शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

खळवाडीला आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 7:51 PM

रत्नापिंप्री येथील घटना: मतदान यंत्रे आगीपासून वाचली

रत्नापिंप्री, ता. पारोळा : रत्नापिंप्री येथे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक खळवाडीला आग लागली. गावात एकीकडे लग्नात गर्दी व दुसरीकडे गावात दुपारी उन्हामुळे स्मशान शांतता होती. अशावेळी अचानक ही प्रचंड आग लागली. यामुळे १९ शेतकऱ्यांचा चारा व शेतीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खाक होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले.या आगीत राजेंद्र पांडुरंग पाटील , भाऊसाहेब बाबूलाल पाटील , राजेेंंद्र देविदास पाटील, प्रभाकर देविदास पाटील, मुरलीधर दगा पाटील, गणेश दगडू पाटील, धुडकू गिरधर पाटील, बाळू बाजीराव वानखेडे, युवराज सैतान पाटील, दिनकर रघुनाथ पाटील, सुकलाल हसरत पाटील, अभिमान दौलत पाटील, विनायक कळू पाटील, सोनू मन्सारम पाटील, पंढरीनाथ महारु पाटील, लोटन दौलत पाटील, आबा नारायण पाटील, विजय हिरमन पाटील, प्रविण रामदास पाटील या सर्वं शेतकरी बांधवांचा चारा व शेड , शेतीपयोगी वस्तू आगीत खाक झाल्या. यामुळे सायंकाळी गुरांना टाकण्यास चारा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.मतदान यंत्रे वाचलीमंगळवारी होणाºया मतदानाच्या दृष्टीने आलेले कर्मचारी भगवान पाटील व मनोज ठाकरे हे लघुशंकेला जात असता त्याचे लक्षात आले की, खळवाडीला आग लागली आहे. त्यांनी गावात लगेच फोन करून कळविले तोपर्यनत त्यांनी जवळच असलेली गुरेढोरे सोडली त्यामध्ये भगवान पाटील यांचे हाताला दुखापत झाली. लगेचच मतदान केंद्राला आग लागलेली पहिली व खोली उघडून पूर्ण सामान काढुन दुसरीकडे हलविला. तोपर्यत बाहेर लावलेले कागद , बॅनर जळून खाक झाले. मनोज ठाकरे यांचे प्रसंगधवनने मतदान केंद्रतील नुकसान वाचले.आग विझविण्यासाठी पारोळा व अमळनेर अग्निशमनच्या गाड्या हजर झाल्या. अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे, अमळनेर पीआय अनिल बडगुजर, पारोळा एपीआय जितद्र खैरनार यांनीही घटनास्थळी भेट दिली. अमळनेर अग्निशमन कर्मचारी नितीन खैरनार, भिका संदानशिव, फारुक शेख, दिनेश बिºहाडे, जफर खान, आनंदा झिम्बल, कमलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संध्याकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.नुकसान भरपाई मिळावीऐन दुष्काळात शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांसाठी चाºयाची व्यवस्था करून ठेवली होती. मात्र या आगीमुळे संपूर्ण चारा जळून खाक झाला, अशा परिस्थितीत पैसे देऊनही चारा उपलब्ध होणार नाही. शासनाने लक्ष देऊन त्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा व चाºयाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.