शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

चंपारण्यात कस्तुरबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:34 PM

गांधीजींच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यामागे कस्तुरबांनी आपली आंतरिक शक्ती उभी केली. त्यांनी चळवळीत केवळ ‘मम’ म्हणून सहभाग नोंदविला नाही. त्या कृतीशील सहकारी राहिल्या. चंपारण्यात कस्तुरबांची खूप वेगळी वेगळी रूपं बघायला मिळाली. ५०-५० लोकांचा स्वयंपाक करणाºया कस्तुरबा, शिक्षिका कस्तुरबा, स्वच्छतेचा व्रत देणाºया कस्तुरबा आणि गांधींची शक्ती बनून दशांगुळे उरलेल्या कस्तुरबा गांधीजी आणि ...

गांधीजींच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यामागे कस्तुरबांनी आपली आंतरिक शक्ती उभी केली. त्यांनी चळवळीत केवळ ‘मम’ म्हणून सहभाग नोंदविला नाही. त्या कृतीशील सहकारी राहिल्या. चंपारण्यात कस्तुरबांची खूप वेगळी वेगळी रूपं बघायला मिळाली. ५०-५० लोकांचा स्वयंपाक करणाºया कस्तुरबा, शिक्षिका कस्तुरबा, स्वच्छतेचा व्रत देणाºया कस्तुरबा आणि गांधींची शक्ती बनून दशांगुळे उरलेल्या कस्तुरबा गांधीजी आणि कस्तुरबांच्या सहजीवनाचे मनोरम चित्र चंपारण्यात दिसते. इतिहासाला ललामभूत असणारा स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास कस्तुरबांच्या आठवणींनी भावसमृद्ध झालेला आहे. बिहारचा लढा गांधी चळवळीत अनेक सत्याग्रही साधकांना जोडणारा ठरला. त्या झगमगत्या अध्यायाचे हे पृष्ठ.निळीचा सत्याग्रह सुरू झाला. गांधीजींना बिहारात शिक्षणाचा अभाव दिसला. पोरे गावात उनाडक्या करत. टिवल्या-बावल्या करत हिंडत. नुसतीच फिरत. त्यांनीे शाळा चालवायचे ठरवले. शिक्षक मिळेनात. त्याना पदवीधारी शिक्षक नको होते. जीवनधारी शिक्षक हवे होते. त्यानीे कस्तुरबावर ही जबाबदारी सोपवली. ती काही शिकलेली नव्हती. तिच्या मनाचा कोंडमारा होत असायचा. पहिल्या भेटीपासून गांधीजींनी तिला शिकायचा आग्रह धरला होता. ‘शिकून घे कस्तूर’, असे सांगितले होते. आपण लक्ष दिले नाही. आपले चुकले हा बोध तिला सतत होत राहिला होता. आपण मागे राहिलो. आपण त्याच्या आग्रहाला मान का नाही दिला? तिचे मन तिला जाब विचारू लागले होते. ती हिरमुसली. चार बायका जमल्यात. यातल्या साºया बायका शिकलेल्या होत्या असे नव्हते. एकदा तर तिने गांधीजींना विचारले, ‘हे बघा, मी शाळेत शिकवण्याचे काम कसे बरे करावे? मला ना लिहिता येतं, ना वाचता येतं. मी शाळेचा उंबरठादेखील कधी ओलांडलेला नाही.’ यावर शांतपणे गांधीजी उत्तरले की, त्याना हे सारे ठाऊक आहे. ‘मग मी काय करेन? ‘या कस्तुरबाच्या प्रश्नावर गांधीजी म्हणाले, ‘तू शाळा झाडून काढशील. शाळा सारवून टाकशील. स्वयंपाक करशील. तू या मुलांना शिकवायचे कामही करशील. ते समजून घे.’ हे ऐकल्यावर कस्तुरबा बोलल्या, ‘पण मला बापडीला स्वत: तरी कुठे येते लिहायला वाचायला? मी काय शिकवणार?’ गांधीजी म्हणाले, ‘अगं मुलाना लिहायला शिकवायचे नाही. वाचायला शिकवायचे नाही. व्याकरण शिकवायचे नाही. गणित शिकवायचे नाही. त्याना जगायला शिकवायचे. परसाकडेहून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. सकाळी दात घासावेत. नखे काढावीत. नाक शिंकरावे. जेवणापूर्वी हात धुवावेत. केसांवर कंगवा फिरवावा. ही रीतभात शिकवायची आहे.’गांधीजींच्या या निवेदनाने ती खूश झाली. ती अभिमानाने त्यांच्याकडे बघत होती. त्याना कधीही कुठलीही अडचण अशी ती येतच नाही. ती कामाला लागली. गावोगावी हिंडली. लोकांना समजावू लागली. वाटेल तिथे थुंकू नये. रस्त्यात लघवी करू नये. चुकीच्या सवयी बदलायला हव्यात. रोज कचरा गोळा करावा. गाव स्वच्छ ठेवावा. झाडू कसा बनवावा? विहिरी कशा स्वच्छ ठेवाव्यात? सांडपाणी कसे वहाते ठेवावे? व्यक्तिगत आरोग्य कसे राखावे? हे सारे ती समजावून सांगत होती. (क्रमश:)- प्रा.डॉ. विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव