शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

कासोदा पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 21:43 IST

११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे.

ठळक मुद्देसंताप : जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात जनता भरडली जातेय पाणी योजना ठेकेदाराला ५६ लाख दंडाची शिफारस

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे. यामुळे जनतेतून मात्र संताप व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत येथे सुमारे ११ कोटी रुपये खर्चाची अंजनी मध्यम प्रकल्पातून तत्कालीन आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. दररोज दरमाणशी ४० लीटर पाणी असे ६२०० कुटुंबाना म्हणजे २६१२० लोकसंख्येसाठी १-६७ द.ल.लीटर पाणी ह्या योजनेला दि.२३ मार्च २०१७ प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. दि.११ एप्रिल २०१८ ला कायार्रंभ झाला असून चाळीसगाव येथील ठेकेदार जे.जे. चौधरी यांनी दि.२६ मार्च २०२० मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. धरण क्षेत्रातील जँकवेल व पंपग्रुहासह ८.८३ कि.मी. पाईपलाईन टाकण्याची कामे झाली असून जलशुद्धीकरण प्रकल्प, गावातील पाईप लाईन ही कामे पूर्णपणे बाकी आहेत. जलकुंभाची कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.दरम्यान, काम मुदतीत न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला ५६ लाख रुपये दंड करण्याची शिफारस जीवन प्राधिकरण विभागाने केली आहे. शासकीय मंजुरी उशिरा मिळाल्याने कामाला उशिराने सुरवात झाल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.गावकऱ्यांना या योजनेबाबत खूप उत्सुकता आहे, कारण कासोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी प्रसिद्ध आहे. या गंभीर समस्येमुळे नोकरदार येथे रहात नाहीत, बाहेर गावाहून ये जा करतात. गेली २०ते २५ वर्षे हे गाव पाणी समस्येशी झुंज देत आहे. परंतू जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादामुळे गावकऱ्यांना धरणात मुबलक पाणी असूनदेखील पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधीनी या गंभीरप्रश्नी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.ठेकेदार कामाकडे लक्ष देत नसल्याने १८० दिवसांसाठी दररोज ३११३५ रुपये याप्रमाणे ५६ लाख चार हजार ३०० एवढा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही पहिली कारवाई आहे. येत्या काही दिवसात कायद्याप्रमाणे अजून मोठी कारवाई करण्यात येणार आहे.-उपविभागीय अधिकारी संजीव नेमाडे, जीवन प्राधिकरण, एरंडोल.मुदतवाढ मिळेल. नोव्हेंबरमध्ये कामाची मंजूर मिळाली आहे. त्यामुळे इतर कामे करताना वेळ लागतो. दंड आकारणीबाबत मला कुठलेही पत्र मिळालेले नाही.-अमोल चौधरी, ठेकेदार, चाळीसगाव.ठेकेदाराची काय अडचण आहे ते कळत नाही. ग्रामपंचायतीने सतत संबंधितांशी पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे.गावाला त्वरित पाणीपुरवठा झाला पाहिजे.- मंगला राक्षे, सरपंच, कासोदा 

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल