शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कासोदा पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 21:43 IST

११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे.

ठळक मुद्देसंताप : जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात जनता भरडली जातेय पाणी योजना ठेकेदाराला ५६ लाख दंडाची शिफारस

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे. यामुळे जनतेतून मात्र संताप व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत येथे सुमारे ११ कोटी रुपये खर्चाची अंजनी मध्यम प्रकल्पातून तत्कालीन आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. दररोज दरमाणशी ४० लीटर पाणी असे ६२०० कुटुंबाना म्हणजे २६१२० लोकसंख्येसाठी १-६७ द.ल.लीटर पाणी ह्या योजनेला दि.२३ मार्च २०१७ प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. दि.११ एप्रिल २०१८ ला कायार्रंभ झाला असून चाळीसगाव येथील ठेकेदार जे.जे. चौधरी यांनी दि.२६ मार्च २०२० मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. धरण क्षेत्रातील जँकवेल व पंपग्रुहासह ८.८३ कि.मी. पाईपलाईन टाकण्याची कामे झाली असून जलशुद्धीकरण प्रकल्प, गावातील पाईप लाईन ही कामे पूर्णपणे बाकी आहेत. जलकुंभाची कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.दरम्यान, काम मुदतीत न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला ५६ लाख रुपये दंड करण्याची शिफारस जीवन प्राधिकरण विभागाने केली आहे. शासकीय मंजुरी उशिरा मिळाल्याने कामाला उशिराने सुरवात झाल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.गावकऱ्यांना या योजनेबाबत खूप उत्सुकता आहे, कारण कासोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी प्रसिद्ध आहे. या गंभीर समस्येमुळे नोकरदार येथे रहात नाहीत, बाहेर गावाहून ये जा करतात. गेली २०ते २५ वर्षे हे गाव पाणी समस्येशी झुंज देत आहे. परंतू जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादामुळे गावकऱ्यांना धरणात मुबलक पाणी असूनदेखील पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधीनी या गंभीरप्रश्नी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.ठेकेदार कामाकडे लक्ष देत नसल्याने १८० दिवसांसाठी दररोज ३११३५ रुपये याप्रमाणे ५६ लाख चार हजार ३०० एवढा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही पहिली कारवाई आहे. येत्या काही दिवसात कायद्याप्रमाणे अजून मोठी कारवाई करण्यात येणार आहे.-उपविभागीय अधिकारी संजीव नेमाडे, जीवन प्राधिकरण, एरंडोल.मुदतवाढ मिळेल. नोव्हेंबरमध्ये कामाची मंजूर मिळाली आहे. त्यामुळे इतर कामे करताना वेळ लागतो. दंड आकारणीबाबत मला कुठलेही पत्र मिळालेले नाही.-अमोल चौधरी, ठेकेदार, चाळीसगाव.ठेकेदाराची काय अडचण आहे ते कळत नाही. ग्रामपंचायतीने सतत संबंधितांशी पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे.गावाला त्वरित पाणीपुरवठा झाला पाहिजे.- मंगला राक्षे, सरपंच, कासोदा 

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल