शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

कासोदा पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 21:43 IST

११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे.

ठळक मुद्देसंताप : जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात जनता भरडली जातेय पाणी योजना ठेकेदाराला ५६ लाख दंडाची शिफारस

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे. यामुळे जनतेतून मात्र संताप व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत येथे सुमारे ११ कोटी रुपये खर्चाची अंजनी मध्यम प्रकल्पातून तत्कालीन आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. दररोज दरमाणशी ४० लीटर पाणी असे ६२०० कुटुंबाना म्हणजे २६१२० लोकसंख्येसाठी १-६७ द.ल.लीटर पाणी ह्या योजनेला दि.२३ मार्च २०१७ प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. दि.११ एप्रिल २०१८ ला कायार्रंभ झाला असून चाळीसगाव येथील ठेकेदार जे.जे. चौधरी यांनी दि.२६ मार्च २०२० मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. धरण क्षेत्रातील जँकवेल व पंपग्रुहासह ८.८३ कि.मी. पाईपलाईन टाकण्याची कामे झाली असून जलशुद्धीकरण प्रकल्प, गावातील पाईप लाईन ही कामे पूर्णपणे बाकी आहेत. जलकुंभाची कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.दरम्यान, काम मुदतीत न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला ५६ लाख रुपये दंड करण्याची शिफारस जीवन प्राधिकरण विभागाने केली आहे. शासकीय मंजुरी उशिरा मिळाल्याने कामाला उशिराने सुरवात झाल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.गावकऱ्यांना या योजनेबाबत खूप उत्सुकता आहे, कारण कासोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी प्रसिद्ध आहे. या गंभीर समस्येमुळे नोकरदार येथे रहात नाहीत, बाहेर गावाहून ये जा करतात. गेली २०ते २५ वर्षे हे गाव पाणी समस्येशी झुंज देत आहे. परंतू जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादामुळे गावकऱ्यांना धरणात मुबलक पाणी असूनदेखील पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधीनी या गंभीरप्रश्नी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.ठेकेदार कामाकडे लक्ष देत नसल्याने १८० दिवसांसाठी दररोज ३११३५ रुपये याप्रमाणे ५६ लाख चार हजार ३०० एवढा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही पहिली कारवाई आहे. येत्या काही दिवसात कायद्याप्रमाणे अजून मोठी कारवाई करण्यात येणार आहे.-उपविभागीय अधिकारी संजीव नेमाडे, जीवन प्राधिकरण, एरंडोल.मुदतवाढ मिळेल. नोव्हेंबरमध्ये कामाची मंजूर मिळाली आहे. त्यामुळे इतर कामे करताना वेळ लागतो. दंड आकारणीबाबत मला कुठलेही पत्र मिळालेले नाही.-अमोल चौधरी, ठेकेदार, चाळीसगाव.ठेकेदाराची काय अडचण आहे ते कळत नाही. ग्रामपंचायतीने सतत संबंधितांशी पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे.गावाला त्वरित पाणीपुरवठा झाला पाहिजे.- मंगला राक्षे, सरपंच, कासोदा 

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल