शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांनी काढली मनातली भडास, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
2
Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
3
Vasai: वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपी मुंब्य्रात अटक, नेमके प्रकरण काय?
4
Nilambari Jagdale: नागपूरकर नीलांबरी बनल्या लुधियानाच्या डीआयजी, पंजाबमध्ये ‘लेडी सिंघम’ म्हणून दरारा!
5
Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
6
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार
7
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
8
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
9
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
10
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
12
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
13
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
14
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
15
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
16
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
17
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
18
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
19
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
20
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
Daily Top 2Weekly Top 5

"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 23:59 IST

जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे.

प्रशांत भदाणे -

जळगाव - केंद्र सरकार कायम म्हणतं की काश्मीर सुरक्षित आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित नाही, हे समोर आलं. हा हल्ला व्हायलाच नको होता. सरकारचं हे अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यासाठी जळगावात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी यावेळी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले की, पहलगाम मध्ये जी घटना घडली, ती व्हायलाच नको होती. आपण किती बेसावध होतो, याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे? हे ओळखण्याचे काम केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दुश्मनाला त्याच्या घरात घुसून मारलं पाहिजे - जयंत पाटील पुढे म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. आपल्या देशाच्या तीनशे किलोमीटर आतमध्ये पण हल्ला होऊ शकतो, हे इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं. इथपर्यंत माणसं येतात, हल्ला करतात आणि निघून जातात. हल्ला झाला हे समजू शकतो. मात्र, त्याला उत्तर द्यायला एकही जवान तिथे उपस्थित नव्हता. दीड तासापर्यंत त्या ठिकाणी मदत मिळाली नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीर खरंच सुरक्षित आहे का? -केंद्रातील नेते कायम सांगतात की काश्मीर सुरक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे काश्मीर सुरक्षित नाही हे आता समोर आले आहे. लोकांना सुरक्षितता वाटेल, असा प्रयत्न केंद्र सरकारने केला पाहिजे. हा हल्ला थोपवायला पाहिजे होता, अशी अपेक्षा होती. पण तिथे प्रतिउत्तर द्यायला कोणीच नव्हतं, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी शेवटी केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस