शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
2
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
3
निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
इंजिनिअर जावई शोधला, लग्नात ६० लाखांचा खर्च; हुंड्यासाठी छळ, लेकीने ६ महिन्यांत आयुष्य संपवलं
6
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
7
'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
8
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
9
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
10
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
11
मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
12
राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
13
बाबा वेंगाचे भाकित: २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखी, प्रलयाने हादरणार जग; पृथ्वीचा एक भाग होणार बेचिराख
14
'माझ्यामुळेच जिंकलो असं कुणी समजू नये', अमित शाहांनी भाजप नेत्यांचे टोचले कान
15
'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
16
'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
17
Video - 'आयफोन' वाला लंच बॉक्स घेऊन शाळेत गेला मुलगा; शिक्षिकाही झाली हैराण
18
अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी
19
ज्यांचे बँक खाते किंवा UPI ID नाही त्यांनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार! भीम ॲपचे नवीन फीचर' लाँच
20
गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'
Daily Top 2Weekly Top 5

"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 23:59 IST

जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे.

प्रशांत भदाणे -

जळगाव - केंद्र सरकार कायम म्हणतं की काश्मीर सुरक्षित आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित नाही, हे समोर आलं. हा हल्ला व्हायलाच नको होता. सरकारचं हे अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यासाठी जळगावात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी यावेळी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले की, पहलगाम मध्ये जी घटना घडली, ती व्हायलाच नको होती. आपण किती बेसावध होतो, याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे? हे ओळखण्याचे काम केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दुश्मनाला त्याच्या घरात घुसून मारलं पाहिजे - जयंत पाटील पुढे म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. आपल्या देशाच्या तीनशे किलोमीटर आतमध्ये पण हल्ला होऊ शकतो, हे इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं. इथपर्यंत माणसं येतात, हल्ला करतात आणि निघून जातात. हल्ला झाला हे समजू शकतो. मात्र, त्याला उत्तर द्यायला एकही जवान तिथे उपस्थित नव्हता. दीड तासापर्यंत त्या ठिकाणी मदत मिळाली नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीर खरंच सुरक्षित आहे का? -केंद्रातील नेते कायम सांगतात की काश्मीर सुरक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे काश्मीर सुरक्षित नाही हे आता समोर आले आहे. लोकांना सुरक्षितता वाटेल, असा प्रयत्न केंद्र सरकारने केला पाहिजे. हा हल्ला थोपवायला पाहिजे होता, अशी अपेक्षा होती. पण तिथे प्रतिउत्तर द्यायला कोणीच नव्हतं, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी शेवटी केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस