शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
3
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
4
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
5
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
6
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
7
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
8
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
9
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
10
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
12
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
13
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
14
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
15
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
16
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
17
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
18
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
19
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
20
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
Daily Top 2Weekly Top 5

"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 23:59 IST

जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे.

प्रशांत भदाणे -

जळगाव - केंद्र सरकार कायम म्हणतं की काश्मीर सुरक्षित आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित नाही, हे समोर आलं. हा हल्ला व्हायलाच नको होता. सरकारचं हे अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यासाठी जळगावात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी यावेळी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले की, पहलगाम मध्ये जी घटना घडली, ती व्हायलाच नको होती. आपण किती बेसावध होतो, याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे? हे ओळखण्याचे काम केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दुश्मनाला त्याच्या घरात घुसून मारलं पाहिजे - जयंत पाटील पुढे म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. आपल्या देशाच्या तीनशे किलोमीटर आतमध्ये पण हल्ला होऊ शकतो, हे इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं. इथपर्यंत माणसं येतात, हल्ला करतात आणि निघून जातात. हल्ला झाला हे समजू शकतो. मात्र, त्याला उत्तर द्यायला एकही जवान तिथे उपस्थित नव्हता. दीड तासापर्यंत त्या ठिकाणी मदत मिळाली नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीर खरंच सुरक्षित आहे का? -केंद्रातील नेते कायम सांगतात की काश्मीर सुरक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे काश्मीर सुरक्षित नाही हे आता समोर आले आहे. लोकांना सुरक्षितता वाटेल, असा प्रयत्न केंद्र सरकारने केला पाहिजे. हा हल्ला थोपवायला पाहिजे होता, अशी अपेक्षा होती. पण तिथे प्रतिउत्तर द्यायला कोणीच नव्हतं, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी शेवटी केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस