शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
3
Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ
4
IndiGo Flights : 'इंडिगो'वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
5
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
6
Shocking: महागड्या फोनवरून वडिलांसोबत वाद; १७ वर्षीय मुलाची १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी!
7
ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
8
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
9
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
10
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
11
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
12
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
13
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
14
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
15
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
17
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
18
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
19
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
20
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 23:59 IST

जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे.

प्रशांत भदाणे -

जळगाव - केंद्र सरकार कायम म्हणतं की काश्मीर सुरक्षित आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित नाही, हे समोर आलं. हा हल्ला व्हायलाच नको होता. सरकारचं हे अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यासाठी जळगावात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी यावेळी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले की, पहलगाम मध्ये जी घटना घडली, ती व्हायलाच नको होती. आपण किती बेसावध होतो, याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे? हे ओळखण्याचे काम केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दुश्मनाला त्याच्या घरात घुसून मारलं पाहिजे - जयंत पाटील पुढे म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. आपल्या देशाच्या तीनशे किलोमीटर आतमध्ये पण हल्ला होऊ शकतो, हे इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं. इथपर्यंत माणसं येतात, हल्ला करतात आणि निघून जातात. हल्ला झाला हे समजू शकतो. मात्र, त्याला उत्तर द्यायला एकही जवान तिथे उपस्थित नव्हता. दीड तासापर्यंत त्या ठिकाणी मदत मिळाली नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीर खरंच सुरक्षित आहे का? -केंद्रातील नेते कायम सांगतात की काश्मीर सुरक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे काश्मीर सुरक्षित नाही हे आता समोर आले आहे. लोकांना सुरक्षितता वाटेल, असा प्रयत्न केंद्र सरकारने केला पाहिजे. हा हल्ला थोपवायला पाहिजे होता, अशी अपेक्षा होती. पण तिथे प्रतिउत्तर द्यायला कोणीच नव्हतं, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी शेवटी केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस