शहरं
Join us  
Trending Stories
1
मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा
2
"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
3
नेहरुंनीही नेपाळच्या राजाला काठमांडूतून उचललेले?; व्हेनेझुएलाच्या निमित्ताने त्या ऐतिहासिक घटनेची चर्चा...
4
शरद पवार यावेळी खासदार बनू शकणार नाहीत? ओवेसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितले; भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत
5
नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
6
पीठ न आंबवता झटपट तयार होणारा अडई डोसा; नाश्ता, जेवण, टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी 
7
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्वतंत्र प्रार्थना सभा का ठेवली?; अखेर हेमा मालिनींनी दिली प्रतिक्रिया
8
"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
9
भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट?  नेटकरी झालेत अवाक् 
10
तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? कळंबोली, तळोजातील मतदार उमेदवारांवर नाराज
11
पुणे: मढेघाटात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा तुफान हल्ला; ३५ हून अधिक जण जखमी, स्थानिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
12
इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
13
"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
14
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: १२ राशींपैकी बाप्पाची कृपा कोणावर? कोणाला फायदा? कोणाला तोटा?
15
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
16
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
17
परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
18
सुरक्षित गुंतवणुकीचा 'सुपर' पर्याय! पोस्टाच्या NSC मध्ये २.५० लाखांवर मिळवा १.१६ लाखांचे फिक्स व्याज
19
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
20
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
Daily Top 2Weekly Top 5

"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 23:59 IST

जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे.

प्रशांत भदाणे -

जळगाव - केंद्र सरकार कायम म्हणतं की काश्मीर सुरक्षित आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित नाही, हे समोर आलं. हा हल्ला व्हायलाच नको होता. सरकारचं हे अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यासाठी जळगावात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी यावेळी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले की, पहलगाम मध्ये जी घटना घडली, ती व्हायलाच नको होती. आपण किती बेसावध होतो, याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे? हे ओळखण्याचे काम केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दुश्मनाला त्याच्या घरात घुसून मारलं पाहिजे - जयंत पाटील पुढे म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. आपल्या देशाच्या तीनशे किलोमीटर आतमध्ये पण हल्ला होऊ शकतो, हे इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं. इथपर्यंत माणसं येतात, हल्ला करतात आणि निघून जातात. हल्ला झाला हे समजू शकतो. मात्र, त्याला उत्तर द्यायला एकही जवान तिथे उपस्थित नव्हता. दीड तासापर्यंत त्या ठिकाणी मदत मिळाली नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीर खरंच सुरक्षित आहे का? -केंद्रातील नेते कायम सांगतात की काश्मीर सुरक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे काश्मीर सुरक्षित नाही हे आता समोर आले आहे. लोकांना सुरक्षितता वाटेल, असा प्रयत्न केंद्र सरकारने केला पाहिजे. हा हल्ला थोपवायला पाहिजे होता, अशी अपेक्षा होती. पण तिथे प्रतिउत्तर द्यायला कोणीच नव्हतं, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी शेवटी केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस