शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘जनता कर्फ्यू’ ला लाभली जनतेची साथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 19:18 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तीन दिवस महापालिका क्षेत्रात जो ‘जनता कर्फ्यू’ लागू केला होता, त्याला यावेळी खरोखरच जनतेने मोलाची साथ दिल्याची भावना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. या जनता कर्फ्यू चे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे...तर लॉकडाऊनची शक्यता

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तीन दिवस महापालिका क्षेत्रात जो ‘जनता कर्फ्यू’ लागू केला होता, त्याला यावेळी खरोखरच जनतेने मोलाची साथ दिल्याची भावना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. या जनता कर्फ्यू चे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवारपासून रविवारपर्यंत तीन दिवस महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू लागू केला होता. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, इतकेच काय भाजीबाजारही यावेळी बंद ठेवण्यात आला होता. या जनता कर्फ्यू ची अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व महापालिकेवर सोपविण्यात आली होती. यावेळच्या जनता कर्फ्यू त प्रथम असे घडले की पोलीस रस्त्यावर नसतानाही जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी दंडूका उगारण्याची वेळच पोलिसांवर आली नाही. जनतेने गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. येत्या काही दिवसात याचे सकारात्मक प्रतिसाद दिसून येतील, नाहीच दिसले तर यात वाढ करण्याचे संकेत आधीच मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती डॉ.मुंढे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव