शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव मनपा निवडणूक : प्रचार संपल्यानंतर पैसे वाटपाला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:05 IST

रात्र वैऱ्याची

ठळक मुद्देप्रचारास बंदी असल्याने प्रत्यक्ष भेटीवर भरआधी चिठ्ठ्या नंतर पैसे

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत असून त्याच्या ४८ तास आधी म्हणजेच सोमवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर थेट किंवा जाहिरातींच्या माध्यमातून अथवा सोशलमिडियाच्या माध्यमातूनही प्रचार करण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई असतानाही रात्री उमेदवारांकडून मतदारांना लपूनछपून पैसे वाटपासाठी चिठ्ठ्या देण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ३० व ३१ जुलै रोजीच्या रात्रीचाही ‘दिवस’ करण्याचे नियोजन केले आहे.सोमवारी रात्री त्याचा प्रत्यय आला. अमूक भागात तमूक वाटतो आहे. एवढा भाव फुटला, उमेदवार अमुकच्या ठिकाणी बसला आहे. अश वावड्या उठत होत्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते व पोलिसांचीही तारांबळ उडत होती. मंगळवार, ३१ जुलै रोजी दिवसभर व रात्रीही हे सर्व प्रकार आणखी जोमात सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी याबाबत तक्रारी करण्यासाठी कर्मचाºयांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले असून त्यावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक प्रशासन आणि पोलिसांच्या दृष्टीने रात्र वैºयाची ठरणार आहे.सोमवार, ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार संपल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी बंद झाल्या. तरीही अफवांचे सत्र मात्र सुरू झाले होते. मतदानाच्या आदल्या दिवसाची रात्र उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह राजकीय पक्षांनाही मोठी आव्हानात्मक असते. तोच प्रकार जळगावातही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विशेषत: तगडे उमेदवार, प्रतिष्ठेच्या लढती या ठिकाणी असे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.सोशल मिडियावरही प्रचारास बंदीमनपाचा प्रचार ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपला. हा प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियाद्वारे तसेच प्रिंट मिडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील. यामध्ये एसएमएस, सोश्ल मिडिया याचाही समावेश आहे. निवडणुकीच्या कायात इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर केल्यास, त्याद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसिद्ध केल्यास सायबर गुन्ह्याचा (बंदी, प्रतिबंध इ.) कायदा २०१५ अंतर्गत तरतुदीनुसार तसेच इतर संबंधीत कायद्यानुसार कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिला आहे.मुदत संपल्याने जाहीर प्रचार करण्यास अथवा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास बंदी असली तरीही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे घरोघरी फिरून मतदारांना आवाहन करीतच असल्याचे दिसून आले.आधी चिठ्ठ्या नंतर पैसेराजकारणी मंडळींनी निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटप करून मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार सुरू केले. मात्र आता त्याची मतदारांनाच चटक लागली आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदार पैसेवाटपाची वाट बघत असतात. काही तर थेट उमेदवारांनाच फोन करून अथवा प्रत्यक्ष गाठून आमच्याकडे इतके मतदार आहेत. काही-तरी करा, असे सांगत आहेत. उमेदवाराने नकार दिला तर शिवीगाळ करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. तसे काही प्रकारच उघडकीस आले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री पैसे वाटण्याऐवजी चिठ्ठ्या वाटण्याचे काम सुरू होते. त्या चिठ्ठ्यांमध्ये मतदार संख्या व रक्कम याचा उल्लेख असून मतदानाच्यावेळी नेमून दिलेल्या माणसांकडून ती रक्कम वाटप केली जाणार असल्याचे समजते.येथे करा तक्रारकाही तक्रार असल्यास आचारसंहिता कक्ष, मनपा ११वा मजला येथे तक्रार स्विकारली जाणार आहे. किंवा एच.एम. खान- ८६२५९९६६२४, विजय देशमुख- ७३५००५०६९३, उमाकांत नष्टे- ९४०३९०५८८५ या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावी. तक्रार संदेशासह पाठविणाºयाचे नाव, मेसेज केव्हा आला यासह पाठवावी. तसेच त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलीस सांगत नाही तोपर्यंत तक्रार व पुरावे डिलीट करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव