शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

जळगाव महापालिकेसाठी भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:15 IST

मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्देभाजपाचा ऐतिहासिक विजयमहापालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्काभाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे दिले आश्वासन

हितेंद्र काळुंखे ।जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.सुरेशदादा जैन यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी गमावल्यानंतर ही मनपा निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय अस्तीत्वाची लढाई होती. तर गिरीश महाजन यांच्या भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला झळाळी देणारी होती.सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा फायदामनपावर हुडको व इतर कर्जाचा डोंगर असल्याने उत्पन्नातील बहुतांश वाटा हा कर्ज फेडण्यातच जात होता. यामुळे विकास कामांसाठी पैसाच शिल्लक राहत नसल्याने गेल्या अनेक वर्षात विकास कामेच होवू शकली नाही. याचबरोबर मनपातील सत्ताधाºयांवर गैरव्यवहाराचा ठपका बसला. ही कारणे मतदारांमध्ये सत्ताधारी खाविआ (शिवसेना) बद्दल नाराजी निर्माण करणारी ठरली. या नाराज मतदारांना विकासाचे आश्वासन देत आपल्याकडे वळविण्यात भाजपाने यश मिळवले....अन्यथा मते मागणार नाहीकेंद्रात व राज्यात सत्ता असल्याने मनपाला कर्जकमुक्त करु, विकासासाठी २ महिन्यातच २०० कोटी आणू आदी आश्वासने महाजन यांनी मतदारांना दिली. ही आश्वासने १ वर्षात पूर्ण नाही झालीत तर विधानसभेत मत मागणार नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांना कसोटीवर लावले होते. हाच मुद्दा मतदारांना अपील करणारा ठरला. फक्त विकास करु असे म्हटले असते तर मतदारांनी कदाचित विश्वास टाकला नसता...आता विश्वास सार्थ ठरवावानगरपालिका आणि मनपाच्या इतिहासात भाजपाला जळगावकरांनी प्रथमच मनपावर एकहाती सत्ता देवून विश्वास टाकला आहे. यामुळे भाजपाचा हा ऐतिहासिकच विजय ठरतो. विकास करु या आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी भाजपाला कौल दिला. यामुळे १ वर्षात विकास करुन दाखवू , एकदा संधी देवून बघा.... असे म्हणणारे महाजन यांना मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे.आयात उमेदवारांचे मिळाले बळभाजपाने मनसे, शिवसेना तसेच राष्ट्रवादीतून अनेक प्रबळ उमेदवार आयात केले. याचाही लाभ भाजपाला झाला. स्वपक्षाच्या १५ पैकी १३ नगरसेवकांना उमेदवारी दिली तर आयात उमेदवारांवर मदार ठेवत खाविआचे ३, राष्ट्रवादीचे ६, मनसेचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह ६ व १ जनक्रांतीचा अशा एकूण १६ आयात नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांना खेचण्यात भाजपाची राज्यातील ‘सत्ता’ हेच प्रभावी अस्त्र ठरले.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा