शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:03 IST

मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे.

जळगाव - मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे. यंदा शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. ‘एमआयएम’ने ३ जागा पटाकावत चमत्कार घडविला तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांच्याही पदरी निराशा पडली. 

जळगाव महापालिकेतील धक्कादायक निकालाने सुरेशदादांची तत्कालीन नपा व नंतर मनपावर असलेली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्चस्व या निवडणुकीत सिद्ध केले आहे. एमआयडीसीतील ई-८मधील गोडावूनमध्ये शुक्रवारी मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

मनपात पहिल्यांदाच मिळाले एका पक्षाला बहुमत 

२००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजपाने ७५ पैकी सर्वाधिक ५७ जागा जिंकत बहुमत मिळविले. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एका जागेसाठी बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर २००८ मध्ये खाविआ सर्वात मोठा पक्ष होवून ३२ जागा मिळाल्या, बहुमतासाठी ३ जागा कमी पडल्या होत्या. तर २०१३ मध्येदेखील ३३ जागा मिळवत खाविआच मोठा पक्ष ठरला होता. मात्र, स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. पण, या निवडणुकीत भाजपाने विरोधकांना भुईसपाट करुन बहुमत प्राप्त केले आहे. 

आघाडीची प्रचंड दैना

मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचारात कोणतीही धार दिसून आली नाही. राज्यपातळीवर एक-दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. तर काँग्रेस व समाजवादी पक्षाची स्थितीदेखील सारखीच होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, २०१३ मध्ये ११ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस