शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:03 IST

मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे.

जळगाव - मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे. यंदा शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. ‘एमआयएम’ने ३ जागा पटाकावत चमत्कार घडविला तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांच्याही पदरी निराशा पडली. 

जळगाव महापालिकेतील धक्कादायक निकालाने सुरेशदादांची तत्कालीन नपा व नंतर मनपावर असलेली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्चस्व या निवडणुकीत सिद्ध केले आहे. एमआयडीसीतील ई-८मधील गोडावूनमध्ये शुक्रवारी मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

मनपात पहिल्यांदाच मिळाले एका पक्षाला बहुमत 

२००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजपाने ७५ पैकी सर्वाधिक ५७ जागा जिंकत बहुमत मिळविले. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एका जागेसाठी बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर २००८ मध्ये खाविआ सर्वात मोठा पक्ष होवून ३२ जागा मिळाल्या, बहुमतासाठी ३ जागा कमी पडल्या होत्या. तर २०१३ मध्येदेखील ३३ जागा मिळवत खाविआच मोठा पक्ष ठरला होता. मात्र, स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. पण, या निवडणुकीत भाजपाने विरोधकांना भुईसपाट करुन बहुमत प्राप्त केले आहे. 

आघाडीची प्रचंड दैना

मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचारात कोणतीही धार दिसून आली नाही. राज्यपातळीवर एक-दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. तर काँग्रेस व समाजवादी पक्षाची स्थितीदेखील सारखीच होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, २०१३ मध्ये ११ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस