शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:03 IST

मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे.

जळगाव - मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे. यंदा शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. ‘एमआयएम’ने ३ जागा पटाकावत चमत्कार घडविला तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांच्याही पदरी निराशा पडली. 

जळगाव महापालिकेतील धक्कादायक निकालाने सुरेशदादांची तत्कालीन नपा व नंतर मनपावर असलेली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्चस्व या निवडणुकीत सिद्ध केले आहे. एमआयडीसीतील ई-८मधील गोडावूनमध्ये शुक्रवारी मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

मनपात पहिल्यांदाच मिळाले एका पक्षाला बहुमत 

२००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजपाने ७५ पैकी सर्वाधिक ५७ जागा जिंकत बहुमत मिळविले. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एका जागेसाठी बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर २००८ मध्ये खाविआ सर्वात मोठा पक्ष होवून ३२ जागा मिळाल्या, बहुमतासाठी ३ जागा कमी पडल्या होत्या. तर २०१३ मध्येदेखील ३३ जागा मिळवत खाविआच मोठा पक्ष ठरला होता. मात्र, स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. पण, या निवडणुकीत भाजपाने विरोधकांना भुईसपाट करुन बहुमत प्राप्त केले आहे. 

आघाडीची प्रचंड दैना

मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचारात कोणतीही धार दिसून आली नाही. राज्यपातळीवर एक-दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. तर काँग्रेस व समाजवादी पक्षाची स्थितीदेखील सारखीच होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, २०१३ मध्ये ११ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस