शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:03 IST

मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे.

जळगाव - मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे. यंदा शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. ‘एमआयएम’ने ३ जागा पटाकावत चमत्कार घडविला तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांच्याही पदरी निराशा पडली. 

जळगाव महापालिकेतील धक्कादायक निकालाने सुरेशदादांची तत्कालीन नपा व नंतर मनपावर असलेली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्चस्व या निवडणुकीत सिद्ध केले आहे. एमआयडीसीतील ई-८मधील गोडावूनमध्ये शुक्रवारी मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

मनपात पहिल्यांदाच मिळाले एका पक्षाला बहुमत 

२००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजपाने ७५ पैकी सर्वाधिक ५७ जागा जिंकत बहुमत मिळविले. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एका जागेसाठी बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर २००८ मध्ये खाविआ सर्वात मोठा पक्ष होवून ३२ जागा मिळाल्या, बहुमतासाठी ३ जागा कमी पडल्या होत्या. तर २०१३ मध्येदेखील ३३ जागा मिळवत खाविआच मोठा पक्ष ठरला होता. मात्र, स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. पण, या निवडणुकीत भाजपाने विरोधकांना भुईसपाट करुन बहुमत प्राप्त केले आहे. 

आघाडीची प्रचंड दैना

मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचारात कोणतीही धार दिसून आली नाही. राज्यपातळीवर एक-दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. तर काँग्रेस व समाजवादी पक्षाची स्थितीदेखील सारखीच होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, २०१३ मध्ये ११ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस