शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये गत पाच वर्षातील सर्वात कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:00 IST

सरासरी ७१ मिमी पावसाची नोंद

जळगाव : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली.जिल्ह्यात गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी म्हणजे सरासरी ७१ मिमी तोही जेमतेम ९ दिवस पाऊस झाला आहे. मात्र तरीही धरणसाठ्यात हळूहळू वाढ होण्यास सुरूवात झाली असून पेरण्याही ४० टक्क्यांहून अधिक आटोपल्या आहेत. मात्र अद्यापही चोपडा तालुका व जिल्ह्यातील काही भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही.जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी १३० मिमी आहे. २०१५ मध्ये जून महिन्यात ११ दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यात सरासरी ११४.१ मिमी पाऊस झाला होता. तर २०१६ मध्ये ७ दिवसांत ९१.८ मिमी, २०१७ मध्ये ११ दिवसांत १०७ मिमी तर २०१८ मध्ये जून महिन्यात १३ दिवसांत ११५.२ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा उशीराने हजेरी लावलेल्या पावसाने जून महिन्यात जिल्ह्यात ९ दिवस हजेरी लावली. त्यात सरासरी ७१ मिमी पाऊस झाला आहे.चार तालुके तहानलेलेचजिल्ह्यात उशीराने का होईना पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र चोपडा, पारोळा, अमळनेर व भडगाव हे चार तालुके अद्यापही तहानलेलेच आहेत. या चारही तालुक्यांची पावसाची सरासरी जून महिना संपला तरीही ५० मिमीपेक्षा कमीच आहे. चोपड्यात ३६.५, पारोळा ४६, अमळनेर ३६.१ तर भडगाव तालुक्यात ४३.२ मिमी पाऊस झाला आहे.धरणसाठ्यात हळूहळू होतेय वाढजिल्ह्यातील तीन प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र तरीही गिरणा व वाघूर धरणात पाण्याची थोडीफार आवक सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी चांगली लावल्याने गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून शून्य टक्क्यांवर असलेला उपयुक्त पाणीसाठा ७.५ टक्क्यांवर आला आहे. तर वाघूरचा उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आला आहे.४० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्यापावसाने उशीरा हजेरी लावल्याने पेरण्यांनाही उशीरा सुरूवात झाली. तर अद्यापही काही भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र तरीही ४० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र जाणकारांच्यामते ६० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. अद्याप कृषी विभागाकडे त्याची आकडेवारी आलेली नाही.ज्वारीच्या क्षेत्रात यंदा १० पट वाढयंदा पूर्वहंगामी लागवडीचे क्षेत्र ७५ हजार वरून १० हजार हेक्टरवर आले. तसेच कपाशीच्या पेरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात दरवर्षीपेक्षा फार वाढ होणार नसल्याचे चित्र आहे. त्यातही राशी ६५९ या नवीन वाणाचा पेरा प्रचंड वाढला आहे. कापसाची जेवढी लागवड झाली आहे, त्यातील निम्मे क्षेत्र हे या राशी ६५९ चेच आहे. मागच्यावर्षी ज्वारीला भाव चांगला मिळाला.तसेच मक्यावर कीड अधिक पडले. त्यामुळे यंदा ज्वारीकडे ओढा वाढला असून ज्वारीचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत १० पट वाढले आहे. तर मक्याचे क्षेत्र तसेच सोयाबीनचे क्षेत्रही कमी झाले आहे. उडीद-मूगाचे क्षेत्रही घटले आहे.टंचाईला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढशासनाच्या स्थायी आदेशानुसार ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. तथापी अद्यापही जिल्ह्यातील काही भागात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने धरण व तलावांमधील अत्यल्प पाणीसाठा विचारात घेऊन तहसीलदारांनी टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या टंचाई उपाययोजनांना ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.४१ गावांचे ४० टँकर झाले कमीजिल्ह्यात २४९ गावांना २२१ टँकरने पाणीपुुरवठा सुरू होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने काही भागात परिस्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे ४१ गावांचे ४० टँकर कमी झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव