शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये गत पाच वर्षातील सर्वात कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:00 IST

सरासरी ७१ मिमी पावसाची नोंद

जळगाव : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली.जिल्ह्यात गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी म्हणजे सरासरी ७१ मिमी तोही जेमतेम ९ दिवस पाऊस झाला आहे. मात्र तरीही धरणसाठ्यात हळूहळू वाढ होण्यास सुरूवात झाली असून पेरण्याही ४० टक्क्यांहून अधिक आटोपल्या आहेत. मात्र अद्यापही चोपडा तालुका व जिल्ह्यातील काही भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही.जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी १३० मिमी आहे. २०१५ मध्ये जून महिन्यात ११ दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यात सरासरी ११४.१ मिमी पाऊस झाला होता. तर २०१६ मध्ये ७ दिवसांत ९१.८ मिमी, २०१७ मध्ये ११ दिवसांत १०७ मिमी तर २०१८ मध्ये जून महिन्यात १३ दिवसांत ११५.२ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा उशीराने हजेरी लावलेल्या पावसाने जून महिन्यात जिल्ह्यात ९ दिवस हजेरी लावली. त्यात सरासरी ७१ मिमी पाऊस झाला आहे.चार तालुके तहानलेलेचजिल्ह्यात उशीराने का होईना पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र चोपडा, पारोळा, अमळनेर व भडगाव हे चार तालुके अद्यापही तहानलेलेच आहेत. या चारही तालुक्यांची पावसाची सरासरी जून महिना संपला तरीही ५० मिमीपेक्षा कमीच आहे. चोपड्यात ३६.५, पारोळा ४६, अमळनेर ३६.१ तर भडगाव तालुक्यात ४३.२ मिमी पाऊस झाला आहे.धरणसाठ्यात हळूहळू होतेय वाढजिल्ह्यातील तीन प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र तरीही गिरणा व वाघूर धरणात पाण्याची थोडीफार आवक सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी चांगली लावल्याने गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून शून्य टक्क्यांवर असलेला उपयुक्त पाणीसाठा ७.५ टक्क्यांवर आला आहे. तर वाघूरचा उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आला आहे.४० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्यापावसाने उशीरा हजेरी लावल्याने पेरण्यांनाही उशीरा सुरूवात झाली. तर अद्यापही काही भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र तरीही ४० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र जाणकारांच्यामते ६० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. अद्याप कृषी विभागाकडे त्याची आकडेवारी आलेली नाही.ज्वारीच्या क्षेत्रात यंदा १० पट वाढयंदा पूर्वहंगामी लागवडीचे क्षेत्र ७५ हजार वरून १० हजार हेक्टरवर आले. तसेच कपाशीच्या पेरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात दरवर्षीपेक्षा फार वाढ होणार नसल्याचे चित्र आहे. त्यातही राशी ६५९ या नवीन वाणाचा पेरा प्रचंड वाढला आहे. कापसाची जेवढी लागवड झाली आहे, त्यातील निम्मे क्षेत्र हे या राशी ६५९ चेच आहे. मागच्यावर्षी ज्वारीला भाव चांगला मिळाला.तसेच मक्यावर कीड अधिक पडले. त्यामुळे यंदा ज्वारीकडे ओढा वाढला असून ज्वारीचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत १० पट वाढले आहे. तर मक्याचे क्षेत्र तसेच सोयाबीनचे क्षेत्रही कमी झाले आहे. उडीद-मूगाचे क्षेत्रही घटले आहे.टंचाईला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढशासनाच्या स्थायी आदेशानुसार ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. तथापी अद्यापही जिल्ह्यातील काही भागात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने धरण व तलावांमधील अत्यल्प पाणीसाठा विचारात घेऊन तहसीलदारांनी टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या टंचाई उपाययोजनांना ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.४१ गावांचे ४० टँकर झाले कमीजिल्ह्यात २४९ गावांना २२१ टँकरने पाणीपुुरवठा सुरू होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने काही भागात परिस्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे ४१ गावांचे ४० टँकर कमी झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव