शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 7:57 PM

जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे.

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात बळीराजा सुखावलाजळगावातील धरण साठ्यातही वाढदीड महिन्यात सरासरी गाठण्याची अपेक्षा

जळगाव : जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. इतकेच नव्हे धरणसाठ्यातही वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र पावसाळ््याचा केवळ दीडच महिना शिल्लक असल्याने यंदा सरासरी एवढा पाऊस होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तापी नदीला पूर आल्याने हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. धरणात मात्र ३९.४१ टक्केच पाणीसाठा आहे. पाण्याची मोठी आवक असली तरी धरणाचे दरवाजे उघडून ते पाणी सोडून देण्यात आले. पावसाळ्याच्या शेवटी हे धरण भरले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.वाघूर नदीला पहूर, वाकोद परिसरातून नाले, ओढ्यांचे पाणी येऊन मिळाल्याने नदी वाहती झाली. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किमान १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाघूर धरणावर जळगाव शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरणात सध्या ३६.३६ टक्के पाणीसाठा आहे. या सोबतच गिरणा धरणातही ३०.३४ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस