शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आठ दिवसांवर स्वातंत्र्य दिन, मंत्रिमंडळ विस्तार नाही, ध्वजारोहण कुणाच्या हस्ते? आठवडाभरात पालकमंत्री मिळणार?

By विजय.सैतवाल | Updated: August 7, 2022 18:40 IST

Jalgaon News: प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत असताना घरोघरी तिरंगा फडकणार आहे. मात्र दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेले नाहीत.

- विजयकुमार सैतवाल जळगाव : प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत असताना घरोघरी तिरंगा फडकणार आहे. मात्र दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेले नाही. त्यामुळे आठ दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्यदिनापर्यंत पालकमंत्री नियुक्ती होऊन त्यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल की जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते हे ध्वजारोहण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लाले आहे.

गेल्या दीड महिन्यात राज्यातील सत्ता समीकरणे बदलले असून महाविकास आघाडीत असलेलेच आमदार आता युती सरकारमध्ये आहे. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्र्यांवर राज्याचा कारभार सुरू असून मंत्रिमंडळ विस्ताराची शिंदे गटात गेलेल्या आमदारांसह भाजप आमदारांनाही प्रतीक्षा आहे. त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्ह्यांना पालकमंत्रीदेखील मिळालेले नसल्याने आठवडाभरावर आलेल्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोणाच्याहस्ते होणार, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

निर्णय लांबणीवरमंत्रिमंडळ विस्तार प्रत्येक वेळी लांबत आहे. न्यायालयात शिवसेना व शिंदे सेनेचा लढा सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता हा न्यायालयीन लढादेखील १२ ऑगस्टपर्यंत लांबला आहे. त्यामुळे त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल व १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यंदाचे ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्याहस्ते होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा आहे पर्यायपालकमंत्री नियुक्त असतानादेखील स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी ते प्रकृती अस्वास्थ अथवा इतर कोणत्याही कारणाने ध्वजारोहणासाठी पोहचू शकले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार सध्या पालकमंत्री नसले तरी व १५ ऑगस्टपर्यंत काही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊ शकते.

आठवडाभरात निर्णयाची शक्यता?मंत्रिमंडळ विस्तार होत नसला तरी व स्वातंत्र्यदिनापर्यंत तो झाला नाही तरी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण होण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ट पातळीवरून मिळाली. आठवडाभरात कोणता तरी निर्णय होणारच असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारIndependence Dayस्वातंत्र्य दिनJalgaonजळगाव