शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 2:47 PM

चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील चित्ररोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे, घशात खवखव व उलटीसारखी लक्षणे वाढलीकोरडा दिवस पाळावा

रईस शेखमेहुणबारे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांची संख्या वाढतच असून मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रोजचे बाह्य रुग्ण पन्नासावर येत आहेत. दुसरीकडे खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे, घशात खवखव व उलटीसारखी लक्षणे वाढली आहेत.पावसामुळे वातावरणातल्या बदलाने संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दूषित पाणीपुरवठ्याने गॅस्ट्रो व मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण, कधी पाऊस, पावसामुळे थंडीचे वातावरण यामुळे जीवाणू व विषाणूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्याला बसत आहे. प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना संसर्गजन्य आजाराचा धोका असतो. मुले व वृद्धांना जास्त धोका वातावरणात बदल झाला की व्हायरलचा धोका अधिक असतो. या वातावरणाचा व व्हायरलचा सर्वाधिक फटका लहान मुले तसेच वृद्धांना बसण्याची दाट शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांंचे म्हणणे आहे.दमाच्या रुग्णांना ञासवातावरणाच्या परिणामामुळे ज्यांना दमाचा ञास होत आहे अशा ज्येष्ठांच्या श्वसनक्रियेवर परिणाम होत असून त्यांना खुपच ञास होत आहे.दमाचा आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्याच्या वातावरणामुळे वायरल इन्फेक्शनचा धोका अधिक आहे. तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, अंग दुखणे आणि डोके दुखण्याचे विकार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनचे आठवडाभरात मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात १७६च्या आसपास रुग्णांनी उपचारासाठी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.व्हायरल इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांकडे या वातावरणात विशेष लक्ष देण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. गावोगावी स्वच्छतेचा अभाव असल्याने साथीचे रोग पसरत आहे. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.कोरडा दिवस पाळावाया वर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. सांडपाणी व साठवणूक केलेले पाणी व गावेगाव असलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराई पसरत असून, मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे व्हायरल इन्फेकशन सर्वत्र होत आहे. थोडा त्रास वाटल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टराचा सल्ला घ्यावा. तसेच पाणी उकळून प्यावे. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांंचे म्हणणे आहे.तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळलाच पाहिजे. तसेच गावात तुंबलेल्या गटाराची पाणी मोकळी करुन वाहती करावी. धुरळणी यंत्राने औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.‘इन्फेक्शन’ची लक्षणेथंडीवाजून ताप येणेमळमळ होणेडोक व संपूर्ण अंग दुखणेसर्दी, खोकलाश्वास घ्यायला त्रास होणेऔषध घेतल्यावरसुध्दा तीन दिवस ताप चढउतार राहणेउपायशक्यतोवर पावसात ओले होऊ नयेपाणी उकळून प्यावेडासांपासून बचाव करणेघरासह परिसर स्वच्छ ठेवणेव्हायरल असलेल्या रुग्णाच्या संपर्क टाळणेया वातावरणात लहान मुलांना हातात पंजा व पायात मोजे घालून त्यांची निगा ठेवावी. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून डास, मच्छर होणार नाही. ताप किंवा थंडी वाजून आल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावा. पाणी गरम करून प्यावे.-डॉ वैधवी पंडितवैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मेहुणबारे

टॅग्स :RainपाऊसChalisgaonचाळीसगाव