शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

मनपा मालकीच्या जागांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:58 AM

अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच ...

अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजय घेंगट यांनी आयुक्तांनी दिलेल्या पत्रामुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मनपा मालकीच्या अनेक जागांचे गैरव्यवहार होत असल्याचे या पत्रात म्हटले होते. तसेच या प्रकरणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता या फाईली गायब झाल्याचे आढळून आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराबाबत मनपा प्रशासन कोणतीही वाच्यता करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनपाच्या जागांचे गैरव्यहार होत आहेत तर दुसरीकडे कोट्यवधींच्या या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने अनेकवेळा काही जणांकडून या जागेचे ताबा घेण्याचे प्रकारदेखील झाले आहेत. तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरात घरकुल योजना सुरू केली होती. त्यातील अनेक योजनांच्या बांधलेल्या घरकुलांचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. अर्धवट बांधलेल्या या घरकुलांचे सांगडे तसेच पडून आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मालमत्तांच्या सुरक्षेसाठीदेखील प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने या बांधकामांची मोडतोड करण्यात आली आहे. सम्राट कॉलनी व महादेव मंदिरासमोरील घरकुलांमध्ये अक्षरश: म्हशी बांधण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने महापालिकेने राबविलेल्या अपूर्णावस्थेतील घरकुल योजनांच्या जमिनी म्हाडाला देवून त्यातून उत्पन्न मिळविण्याच्या पर्यायाचा विचार प्रशासनाचाहोता. याबाबत महासभेत ठरावदेखील करण्यात आला. म्हाडानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली. मात्र याबाबतही प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही होत नसल्याने तोही प्रस्ताव रखडला आहे. मनपाच्याच मालकीची असलेली जागा आज धूळ खात पडून असून, याकडे सुस्त प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात मनपा मालकीच्या सुमारे १०० कोटीच्यावर अधिक भाव असलेल्या मालमत्ता आहेत. या जागांचा उपयोग केल्यास मनपाला आर्थिक फायदा देखील होवू शकतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव