शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

१० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:01 PM

९ हजार ७० शेतकऱ्यांचे नुकसान, झाडे पिवळी पडू लागली

ठळक मुद्देदुष्काळाचा दाह 

जळगाव : दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवरील फळबागांपैकी १० हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी ७८३४ शेतकºयांच्या ८ हजार ७९६ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून अनेक बागा सुकून गेल्या आहेत.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या जेमतेम ६७ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमीच पाऊस झाल्याने यंदा जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यांमध्येही दुष्काळीच परिस्थिती आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरूच होते. तर पावसाळा संपताच टँकरची संख्या वाढू लागली आहे.पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती असल्याने फळबागांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे पिवळी पडत चालली आहेत.१२३८ हेक्टरवर ३३ ते ५५ टक्के नुकसानजिल्ह्यातील १२३६ श्ोतकºयांचे सुमारे १२३८ हेक्टरवरील फळबागांचे ३३ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यात पाचोरा तालुक्यात ४९७ हेक्टर, चाळीसगाव २९८ हेक्टर, जामनेर १२२ हेक्टर, भडगाव ३६ हेक्टर, मुक्ताईनगर ५४ हेक्टर, बोदवड २९ तर जळगाव तालुक्यात २०२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.अनेक बागा वाळल्याजिल्ह्यात केळीचे क्षेत्र वगळून सुमारे ४० हजार हेक्टरवर फळबागा आहेत. त्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळींब, लिंबू, सिताफळ, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र दुष्काळामुळे पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे कृषी विभागातर्फे या बागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे.८७९६ हेक्टरवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानजिल्ह्यातील ७८३४ शेतकºयांच्या ८७९६.८७ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात भुसावळ तालुक्यात २८७ हेक्टर, बोदवड ४१, यावल ४३, मुक्ताईनगर ६०, अमळनेर ३९७ हेक्टर, चोपडा ४३५ हेक्टर,पारोळा ३७८.९२ हेक्टर, चाळीसगाव २९८८ हेक्टर, जामनेर २४४ हेक्टर, पाचोरा ८८१ तर भडगाव तालुक्यात ३०४२ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ