शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:01 IST

९ हजार ७० शेतकऱ्यांचे नुकसान, झाडे पिवळी पडू लागली

ठळक मुद्देदुष्काळाचा दाह 

जळगाव : दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवरील फळबागांपैकी १० हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी ७८३४ शेतकºयांच्या ८ हजार ७९६ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून अनेक बागा सुकून गेल्या आहेत.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या जेमतेम ६७ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमीच पाऊस झाल्याने यंदा जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यांमध्येही दुष्काळीच परिस्थिती आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरूच होते. तर पावसाळा संपताच टँकरची संख्या वाढू लागली आहे.पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती असल्याने फळबागांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे पिवळी पडत चालली आहेत.१२३८ हेक्टरवर ३३ ते ५५ टक्के नुकसानजिल्ह्यातील १२३६ श्ोतकºयांचे सुमारे १२३८ हेक्टरवरील फळबागांचे ३३ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यात पाचोरा तालुक्यात ४९७ हेक्टर, चाळीसगाव २९८ हेक्टर, जामनेर १२२ हेक्टर, भडगाव ३६ हेक्टर, मुक्ताईनगर ५४ हेक्टर, बोदवड २९ तर जळगाव तालुक्यात २०२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.अनेक बागा वाळल्याजिल्ह्यात केळीचे क्षेत्र वगळून सुमारे ४० हजार हेक्टरवर फळबागा आहेत. त्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळींब, लिंबू, सिताफळ, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र दुष्काळामुळे पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे कृषी विभागातर्फे या बागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे.८७९६ हेक्टरवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानजिल्ह्यातील ७८३४ शेतकºयांच्या ८७९६.८७ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात भुसावळ तालुक्यात २८७ हेक्टर, बोदवड ४१, यावल ४३, मुक्ताईनगर ६०, अमळनेर ३९७ हेक्टर, चोपडा ४३५ हेक्टर,पारोळा ३७८.९२ हेक्टर, चाळीसगाव २९८८ हेक्टर, जामनेर २४४ हेक्टर, पाचोरा ८८१ तर भडगाव तालुक्यात ३०४२ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ