शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:01 IST

९ हजार ७० शेतकऱ्यांचे नुकसान, झाडे पिवळी पडू लागली

ठळक मुद्देदुष्काळाचा दाह 

जळगाव : दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवरील फळबागांपैकी १० हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी ७८३४ शेतकºयांच्या ८ हजार ७९६ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून अनेक बागा सुकून गेल्या आहेत.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या जेमतेम ६७ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमीच पाऊस झाल्याने यंदा जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यांमध्येही दुष्काळीच परिस्थिती आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरूच होते. तर पावसाळा संपताच टँकरची संख्या वाढू लागली आहे.पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती असल्याने फळबागांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे पिवळी पडत चालली आहेत.१२३८ हेक्टरवर ३३ ते ५५ टक्के नुकसानजिल्ह्यातील १२३६ श्ोतकºयांचे सुमारे १२३८ हेक्टरवरील फळबागांचे ३३ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यात पाचोरा तालुक्यात ४९७ हेक्टर, चाळीसगाव २९८ हेक्टर, जामनेर १२२ हेक्टर, भडगाव ३६ हेक्टर, मुक्ताईनगर ५४ हेक्टर, बोदवड २९ तर जळगाव तालुक्यात २०२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.अनेक बागा वाळल्याजिल्ह्यात केळीचे क्षेत्र वगळून सुमारे ४० हजार हेक्टरवर फळबागा आहेत. त्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळींब, लिंबू, सिताफळ, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र दुष्काळामुळे पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे कृषी विभागातर्फे या बागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे.८७९६ हेक्टरवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानजिल्ह्यातील ७८३४ शेतकºयांच्या ८७९६.८७ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात भुसावळ तालुक्यात २८७ हेक्टर, बोदवड ४१, यावल ४३, मुक्ताईनगर ६०, अमळनेर ३९७ हेक्टर, चोपडा ४३५ हेक्टर,पारोळा ३७८.९२ हेक्टर, चाळीसगाव २९८८ हेक्टर, जामनेर २४४ हेक्टर, पाचोरा ८८१ तर भडगाव तालुक्यात ३०४२ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ