शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

केंद्रीय पथकाचे वरातीमागून घोडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:16 PM

नुकसान झालेले पीक उपटून रब्बीची पेरणीही सुरू : पाहणी कसली करणार? हा प्रश्न

जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक २२ रोजी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. मात्र शासनाकडून पंचनामे पूर्ण होऊन मदतीच्या रक्कमेचा पहिला हप्ताही प्राप्त होऊन गेल्याने शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक उपटून टाकून रब्बीची पेरणीही करून टाकली आहे. त्यामुळे आता केंद्रीय पथकाला कोणते नुकसान दाखवायचे? असा प्रश्न जिल्ह््यातील अधिकाऱ्यांना पडला आहे. केंद्रीय पथकाच्या हा दौरा म्हणजे वरातीमागून घोडे... अशीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातच चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडूनही मदत मिळण्याची मागणी होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून आता नुकसानीच्या पाहणीसाठी पथक पाठविण्यात येत आहे.समितीचा धावता दौराकेंद्र शासनाने पाहणीसाठी पाठविलेल्या अधिकाºयांकडे एक महसूल विभाग पूर्ण सोपविला आहे. या विभागातील पाच-सहा जिल्ह्यांमधील प्रतिनिधीक गावांची अवघ्या दोन दिवसांत पाहणी करून त्यांना २४ रोजी दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित रहावयाचे आहे. नाशिक महसूल विभागाची जबाबदारी केंद्रीय अर्थ मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व जयपूर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा यांच्याकडे सोपविली आहे. हे अधिकारी नाशिक, नंदुबार, धुळे, जळगाव व नंतर अहमदनगर या जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत. हे पथक धुळे जिल्ह्यातील पाहणी आटोपून २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पारोळा, एरंडोल तालुक्यातील गावांची पाहणी करीत सायंकाळी ६ च्या आत जळगावात मुक्कामी येणार आहे. कारण पाहणी अंधार पडण्याच्या आतच करावी लागणार आहे. त्यानंतर २३ रोजी सकाळी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील गावांची पाहणी करीत औरंगाबादमार्गे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पाहणी करून सायंकाळपर्यंत अहमदनगरला पोहोचाणार आहेत.पाहणी कसली करणार?जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीपाचे जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्याबाबत राज्य शासनाच्या आदेशावरून प्रशासनाने पंचनामे करून भरपाईच्या मागणीचे प्रस्तावही रवाना केले. त्यानुसार मंगळवार, १९ रोजीच पहिला हप्ताही प्राप्त झाला आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरीपाचे नुकसान झाले तरी जमिनीत प्रचंड ओल असल्याने रब्बीचे पीक तरी चांगले येईल, या आशेने नुकसान झालेले पीक उपटून रब्बीची लागवडही करून टाकली आहे. तर काही शेतकºयांकडून पेरणी सुरू आहे. नोव्हेंबर महिना संपत आला असल्याने रब्बीच्या पेरणीचा कालावधीही संपत आला आहे. त्यामुळे शेतकºयांकडून घाईगर्दी सुरू आहे.मागणी ६४३ कोटींची मदत प्राप्त १७९ कोटीराज्य शासनाने ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभाग, महसूल व जि.प.ला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातही पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले. तसेच या नुकसानी पोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत केले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव