शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग झाला बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 17:48 IST

अपघात वाढले : वाहन चालविणे कठीण झाल्याने नागरिक हैराण

भुसावळ : चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने जळगाव- नागपूर महामार्ग धोकादायक बनला असून अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. या मार्गावरुन वाहनधकारकांना वाहन चालविताना अक्षरश: कसरत करावी लागते. जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, अशी अपेक्षा यामुळे व्यक्त होत आहे.दोघे झाले जखमीगुरुवारी सायंकाळी देखील साकेगाव जवळ या महामार्गावर एक अपघात झाला. यात दोघे मोटरसायकलस्वार जखमी झाले. देवीदास लटकन कोळी (५८) रा. साकेगाव हे दुचाकीवरून जात असताना गोदावरी कृषी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी शिवम अनिल चौधरी (२२) रा.विटवे ता.रावेर हा पाठीमागून येत होता. त्याच वेळेस महामार्गावर ट्रक क्रमांक (एम. एच. १९- ए. ए. ७४२९ हा महामार्गावर थांबला होता. या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी निघाले असता त्याच वेळेस कालीपिली ने प्रवासी उतरण्यासाठी रस्त्यावरच ब्रेक मारून दरवाजा उघडला असता मागील दोन्ही दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले व जोराची धडक झाली, यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. साकेगावचे कोळी यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात तर विटवेचा विद्यार्थी यास गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.नेहमीच वाहतुकीचा खोळंबासध्या रस्ता अरुंद झाल्याने किरकोळ अपघात झाल्यास अथवा वाहनांची गर्दी यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचा खोळंबा झाल्यास वेळही वाया जातो. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.