शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ब्रश पकडणेही शक्य नसताना त्यांच्याकडूनही शुभेच्छा पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 19:36 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुभेच्छा कार्डांच्या किमयेविषयी लिहिताहेत कलावंत जयंत पाटील...

मी आनंदवनात होतो़ काही काळ वास्तव्यानंतर वाटले, ज्या लोकांना बोटे नाहीत, ज्यांच्या हातांना जखमा आहेत़ त्यामुळे त्यांना पेन्सील, ब्रश पकडणे अशक्यच होते आणि मला वाटते त्यांच्यासाठी शुभेच्छाकार्ड तयार करण्याचा विभाग सुरू केला तर? डॉ़विकास आमटे यांनीदेखील संमती दिली आणि मग काय, कल्पनाच कल्पना सुचल्या. चिमणचारा, शेवमेंढा, लाकडाचा रंधा करताना निघालेले भेंडोळे, शिंंप्याकडच्या निघालेल्या च्ािंंध्या असे सारे साहित्य वापरून हळुहळु रुग्णांमध्ये आत्मविश्वास यायला लागला़ मला एका आनंदवन प्रेमी व्यक्तीकडून रविंद्रनाथ टागोरांचे.़़ हे छोट्या-छोट्या कणिका कवितांचे पुस्तक मिळाले होते़ त्यातल्या काही दोन-दोन, तीन-तीन ओळींच्या कविता आम्ही शुभेच्छा कार्डामध्ये वापरल्या. या पेशंटमधून रमेश अम्रू हा एक उत्साहाने सळसळणारा तरूण मिळाला आणि शुभेच्छा कार्डानी चांगलाच वेग घेतला़शुभेच्छा कार्डविभाग चहुअंगानी बहरला. १९८० साली अगदी सप्टेंबर महिन्याच्या ९ तारखेला म्हणजे माझ्या वाढदिवशी मी आनंदवनातून घरी परतलो. आपण पाहात आहात, त्या शुभेच्छा कार्डात मी टागोरांच्या त्याच पुस्तकातील ओळी वापरल्या आहेत़ पण तुमच्या लक्षात आले की, त्यावेळी टाईपराइटींग वगैरे काही प्रकार नव्हता़ म्हणूनच मी तो सारा मजकूर हाताने लिहिला आहे़ जळगावात ब्लॉकमेकर्स होतेच पण मी माझ्या काही कमर्शिअल कामांसाठी मुंबईहून ब्लॉक करून आणायचो़ या शुभेच्छा कार्डाचे ब्लॉक्सही मुंबईहून करून आणले होते़ कार्डाचे प्रीटीग कोलते बंधू यांच्या प्रेसमध्ये झाले आहे़ शंभर-सव्वाशे कार्डस छापले असावेत़ १९८१ ला माझे शैलजाशी लग्न झाले़ म्हणूनच शुभेच्छा कार्डावर आमची दोघांची नावे आहेत़खरं तर मी मराठी कॉपीरायटर, पण मला या शुभेच्छा कार्डात इंग्रजीचा आधार लागला़ या पुढची सर्व शुभेच्छा कार्डे मराठीत आहेत़ माझ्या एकही शुभेच्छा कार्डात मी सुखसमृद्धीच्या शुभेच्छा कधीच दिलेल्या नाहीत़ जगताना आपल्याला वेगळेच काही लागते़ आनंदवनात जाण्याआधी मी कोल्हापुरात एका जाहिरात एजन्सीत आर्टिस्ट म्हणून काम करीत होतो़ मी शिक्षणासाठी बाहेर पडण्याआधी माझ्या आसोद्याच्या समृद्ध वाचनालयाने माझे आधीच बौद्धीक भरण- पोषण केले होते़ पुणे-कोल्हापुरात वाचणारे मित्र मिळालेत. पुस्तकांनी जो माझ्या गळ्यात हात घातला तो सत्तरीच्या वळणावरही तसाच आहे़ पुढच्या सर्व शुभेच्छाकार्डावर मन:पूर्वक जगण्यातून आलेले अनेक सुखद कवडसे आहेत़ माझ्या वाचन-चिंतनासाठी मी कठोरपणे सार्वजनिक जीवन नाकारले कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तऱ़़‘दुर हजारांपासूनी विजनामधी माझे घरटे मी पण भरले जयांत माझे जे आहे माझ्या पुरते’़स्वत:चे एकटेपण प्राणपणाने जपणे, स्वत:वर कधीच कोणती दडपणे येऊ न देणे हे आता व्रताच झाले आहे़ (क्रमश:)-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव