शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:41 IST

मालाची आवक मंदावली

ठळक मुद्देहळूहळू वाढ होणारसप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यता

विजयकुमार सैतवालजळगाव : खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर धान्य तसेच डाळींच्या भावात आतापासूनच वाढ होण्यास सुुरुवात झाली आहे. शहरात एकाच दिवसात धान्य व डाळींच्या भावात १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ करण्याची घोषणा करीत ४ जुलै रोजी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. हमीभाव वाढविलेल्या पिकांमध्ये धान्य व कडधान्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.एकाच दिवसात मोठी वाढखरीप पिकांसाठी हा वाढीव हमीभाव मिळणार असला तरी आतापासूनच धान्य व डाळींचे भाव वधारत आहेत. ४ रोजी हमीभाव वाढीचा निर्णय झाला. त्यानंतर ६ जुलै रोजी उडीद डाळ वगळता इतर डाळी व ज्वारी, बाजरी यांच्या भावात वाढ झाली. ५ रोजी १४५० ते १५५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या बाजरीचे भाव ६ रोजी १६५० ते १७५० रुपयांवर पोहचले. अशाच प्रकारे १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल असलेले ज्वारीचे भाव ६ रोजी १७०० ते १९०० रुपये प्रती क्विंटल झाले. डाळींमध्ये ५५०० ते ५९०० रुपये प्रती क्विंटल असलेली तूर डाळ ५७०० ते ६१००, मूग डाळ ६४०० ते ६८०० वरून ६६०० ते ७००० आणि हरभरा डाळ ४४०० ते ४८०० वरून ४५०० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. उडीद डाळ मात्र ४४०० ते ४८०० रुपयांवर स्थिर आहे.हळूहळू वाढ होणारकेंद्र सरकारने ज्या प्रमाणात हमीभावात वाढीची घोषणा केली आहे, त्या प्रमाणात आताची ही वाढ नसली तरी त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे. सध्या शेतकºयांकडे जो माल शिल्लक आहे, तो माल आता शेतकºयांनी बाजारात आणणे थांबविले आहे. खरीप हंगाम येईल त्या वेळी माल विक्री केल्यास अधिक फायदा होण्याची प्रतीक्षा राहणार असल्याने सध्या आवक मंदावली असल्याचे सांगितले जात आहे.मागणी नसताना भाववाढमागणी व पुरवठ्याच्या गणितानुसार चित्र पाहिले तर सध्या मागणी नसल्याने भाव कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या मागणी नसताना धान्य व डाळींच्या भावात वाढ झाली आहे. बाजारात आवक थांबल्याने व नवीन हंगाम येईपर्यंत मालाची उपलब्धता कशी असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यतासध्या शालेय साहित्य खरेदीमुळे धान्य व डाळींच्या बाजारात उठाव नसतो. तसेच शेतकरीही शेती कामात व्यस्त असतो. त्यामुळे धान्य बाजारात सप्टेंबर-आॅक्टोबरपासून उलाढाल वाढीस सुरुवात होते. त्यात यंदा सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये नवीन हंंगामातील मालास वाढीव हमीभाव मिळण्यासह मागणी वाढून धान्य व डाळींचे भाव त्या काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.हमीभाव जाहीर झाल्यानंतर त्या प्रमाणात धान्य व डाळींचे भाव सध्या वाढले नसले तरी १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने त्यात वाढ झाली आहे. सध्या मालाची आवकही थांबल्याने त्याचा परिणाम होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Market committee washimबाजार समिती वाशिमJalgaonजळगाव