शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:41 IST

मालाची आवक मंदावली

ठळक मुद्देहळूहळू वाढ होणारसप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यता

विजयकुमार सैतवालजळगाव : खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर धान्य तसेच डाळींच्या भावात आतापासूनच वाढ होण्यास सुुरुवात झाली आहे. शहरात एकाच दिवसात धान्य व डाळींच्या भावात १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ करण्याची घोषणा करीत ४ जुलै रोजी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. हमीभाव वाढविलेल्या पिकांमध्ये धान्य व कडधान्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.एकाच दिवसात मोठी वाढखरीप पिकांसाठी हा वाढीव हमीभाव मिळणार असला तरी आतापासूनच धान्य व डाळींचे भाव वधारत आहेत. ४ रोजी हमीभाव वाढीचा निर्णय झाला. त्यानंतर ६ जुलै रोजी उडीद डाळ वगळता इतर डाळी व ज्वारी, बाजरी यांच्या भावात वाढ झाली. ५ रोजी १४५० ते १५५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या बाजरीचे भाव ६ रोजी १६५० ते १७५० रुपयांवर पोहचले. अशाच प्रकारे १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल असलेले ज्वारीचे भाव ६ रोजी १७०० ते १९०० रुपये प्रती क्विंटल झाले. डाळींमध्ये ५५०० ते ५९०० रुपये प्रती क्विंटल असलेली तूर डाळ ५७०० ते ६१००, मूग डाळ ६४०० ते ६८०० वरून ६६०० ते ७००० आणि हरभरा डाळ ४४०० ते ४८०० वरून ४५०० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. उडीद डाळ मात्र ४४०० ते ४८०० रुपयांवर स्थिर आहे.हळूहळू वाढ होणारकेंद्र सरकारने ज्या प्रमाणात हमीभावात वाढीची घोषणा केली आहे, त्या प्रमाणात आताची ही वाढ नसली तरी त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे. सध्या शेतकºयांकडे जो माल शिल्लक आहे, तो माल आता शेतकºयांनी बाजारात आणणे थांबविले आहे. खरीप हंगाम येईल त्या वेळी माल विक्री केल्यास अधिक फायदा होण्याची प्रतीक्षा राहणार असल्याने सध्या आवक मंदावली असल्याचे सांगितले जात आहे.मागणी नसताना भाववाढमागणी व पुरवठ्याच्या गणितानुसार चित्र पाहिले तर सध्या मागणी नसल्याने भाव कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या मागणी नसताना धान्य व डाळींच्या भावात वाढ झाली आहे. बाजारात आवक थांबल्याने व नवीन हंगाम येईपर्यंत मालाची उपलब्धता कशी असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यतासध्या शालेय साहित्य खरेदीमुळे धान्य व डाळींच्या बाजारात उठाव नसतो. तसेच शेतकरीही शेती कामात व्यस्त असतो. त्यामुळे धान्य बाजारात सप्टेंबर-आॅक्टोबरपासून उलाढाल वाढीस सुरुवात होते. त्यात यंदा सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये नवीन हंंगामातील मालास वाढीव हमीभाव मिळण्यासह मागणी वाढून धान्य व डाळींचे भाव त्या काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.हमीभाव जाहीर झाल्यानंतर त्या प्रमाणात धान्य व डाळींचे भाव सध्या वाढले नसले तरी १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने त्यात वाढ झाली आहे. सध्या मालाची आवकही थांबल्याने त्याचा परिणाम होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Market committee washimबाजार समिती वाशिमJalgaonजळगाव