शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
3
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
4
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
5
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
6
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
7
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
8
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
9
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
10
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
13
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
14
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
15
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
16
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
17
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
18
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
19
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:41 IST

मालाची आवक मंदावली

ठळक मुद्देहळूहळू वाढ होणारसप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यता

विजयकुमार सैतवालजळगाव : खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर धान्य तसेच डाळींच्या भावात आतापासूनच वाढ होण्यास सुुरुवात झाली आहे. शहरात एकाच दिवसात धान्य व डाळींच्या भावात १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ करण्याची घोषणा करीत ४ जुलै रोजी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. हमीभाव वाढविलेल्या पिकांमध्ये धान्य व कडधान्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.एकाच दिवसात मोठी वाढखरीप पिकांसाठी हा वाढीव हमीभाव मिळणार असला तरी आतापासूनच धान्य व डाळींचे भाव वधारत आहेत. ४ रोजी हमीभाव वाढीचा निर्णय झाला. त्यानंतर ६ जुलै रोजी उडीद डाळ वगळता इतर डाळी व ज्वारी, बाजरी यांच्या भावात वाढ झाली. ५ रोजी १४५० ते १५५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या बाजरीचे भाव ६ रोजी १६५० ते १७५० रुपयांवर पोहचले. अशाच प्रकारे १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल असलेले ज्वारीचे भाव ६ रोजी १७०० ते १९०० रुपये प्रती क्विंटल झाले. डाळींमध्ये ५५०० ते ५९०० रुपये प्रती क्विंटल असलेली तूर डाळ ५७०० ते ६१००, मूग डाळ ६४०० ते ६८०० वरून ६६०० ते ७००० आणि हरभरा डाळ ४४०० ते ४८०० वरून ४५०० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. उडीद डाळ मात्र ४४०० ते ४८०० रुपयांवर स्थिर आहे.हळूहळू वाढ होणारकेंद्र सरकारने ज्या प्रमाणात हमीभावात वाढीची घोषणा केली आहे, त्या प्रमाणात आताची ही वाढ नसली तरी त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे. सध्या शेतकºयांकडे जो माल शिल्लक आहे, तो माल आता शेतकºयांनी बाजारात आणणे थांबविले आहे. खरीप हंगाम येईल त्या वेळी माल विक्री केल्यास अधिक फायदा होण्याची प्रतीक्षा राहणार असल्याने सध्या आवक मंदावली असल्याचे सांगितले जात आहे.मागणी नसताना भाववाढमागणी व पुरवठ्याच्या गणितानुसार चित्र पाहिले तर सध्या मागणी नसल्याने भाव कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या मागणी नसताना धान्य व डाळींच्या भावात वाढ झाली आहे. बाजारात आवक थांबल्याने व नवीन हंगाम येईपर्यंत मालाची उपलब्धता कशी असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यतासध्या शालेय साहित्य खरेदीमुळे धान्य व डाळींच्या बाजारात उठाव नसतो. तसेच शेतकरीही शेती कामात व्यस्त असतो. त्यामुळे धान्य बाजारात सप्टेंबर-आॅक्टोबरपासून उलाढाल वाढीस सुरुवात होते. त्यात यंदा सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये नवीन हंंगामातील मालास वाढीव हमीभाव मिळण्यासह मागणी वाढून धान्य व डाळींचे भाव त्या काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.हमीभाव जाहीर झाल्यानंतर त्या प्रमाणात धान्य व डाळींचे भाव सध्या वाढले नसले तरी १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने त्यात वाढ झाली आहे. सध्या मालाची आवकही थांबल्याने त्याचा परिणाम होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Market committee washimबाजार समिती वाशिमJalgaonजळगाव