शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

गोड तुझे नाम विठोबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:36 IST

विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की, त्याला उपमाच नाही

ठळक मुद्देकलीयुगात फक्त ‘हरिनाम’ हा एक उत्तम मार्ग आहे.

या वर्षी मात्र १५ जानेवारीला मकरसंक्रांत येत आहे. यामुळेच या वर्षी प्रयागला होणारा कुंभमेळा देखील १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. यादिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी सूर्य दक्षिणायनातून ते उत्तरायणात प्रवेश करतो. महाभारतात भीष्माचार्यांनी आपला देह त्यागासाठी मकर संक्रांतीचा काळ निवडला होता.मकर संक्रांतच्या दिवशी महाराष्टÑात एकमेकांना तीळ, गुळ दिला जातो. विद्वानांच्या मते काही शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व देखील आहे. वारकरी परंपरेचे पाया, संत ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाच्या नामाला गोड म्हटले आहे. जसं मकर संक्रांतीच्या दिवशी ‘गोड गोड बोला’ हे म्हटल जातं, त्याच प्रमाणे वारकरी सांप्रदायात नेहमीसाठी म्हटल जातं.गोड तुझे नाम विठोबा आवडले मज । दुजे उच्चारिता मना वाटतसे लाज ।।संत ज्ञानेश्वर हे योगी परंपरेचे, संत नामदेवांनी त्यांचा गौरव करताना म्हटले आहे, साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली ।असे असतांना देखील संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, ‘गोड तुझे नाम’ विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की, त्याला उपमाच नाही, वारकरी परंपरा ही नामाच्या अधिष्ठानावर उभी आहे. संत ज्ञानोंबापासून तर संत निळोबारायापर्यंत सर्व वारकरी संतांनी नामालाच प्रधान मानले आहे. ज्ञानोबाचा नामावर सुलभ, सरळ आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ‘हरिपाठ’ प्रसिद्ध आहे. हरिपाठाचा गोडवा म्हणजे ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा।’ संत ज्ञानोबांनी तर एका अभंगात स्पष्ट केले.सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहता। नाम आठविता रुपी प्रकट पै झाला ।।ज्या दिवशी प्रेमाने श्री विठ्ठलाचे नाम आठवले, त्याच दिवशी तो प्रगट झाला आणि हाच सोनियाचा दिवस आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. संत निळोबाराय तर नाम आणि श्रीविठ्ठलाशिवाय काहीच मानत नाही.सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी भगवंताचे नाम हे कलियुगात महत्वाचे म्हटले आहे,श्री विठ्ठलाचे नाम इतकं गोड आहे की, आज हजारो वर्ष झाली तरी त्याची गोडी कमी झालेली नाही तर उलट वाढतच आहे आणि वाढतच राहणार. महाराष्टÑात वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा सांप्रदाय आहे. योग, याग, तप, यज्ञ वगैरे याला महत्व न देता फक्त नामाला महत्व आहे. संत निळोबांनी सांगितले आहे क ी,नेणती काही टाणा टोणा । कुठलाही धागा नाही, दोरा नाही फक्त श्रीविठ्ठलाचे नाम. संत तुकाराम महाराज म्हणतात,प्राणिया रे एक बीज मंत्र उच्चारी । प्रतिदिनी रामकृष्ण म्हण का मुरारीया अभंगाद्वारे संत तुकोबा, फक्त मानवालाच नाही तर सर्व प्राणीमात्राला सांगतात की, रामकृष्ण हा बीज मंत्र आहे आणि प्रतिदिन याचा आपल्या वाचेने उच्चार करा, यातच या कलीयुगात सर्वांचे कल्याण आहे. आणि हेच साधन उत्तम आहे. उपवास, धुम्रपान, पंचाग्नीसाधन वगैरे वारकऱ्यांसाठी नाही, असा बीज मंत्र सर्व संतांनी सांगितला आहे. कलीयुगात फक्त ‘हरिनाम’ हा एक उत्तम मार्ग आहे. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितले आहे.कृष्ण विष्णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।माझी आत्मयची । उदंड गाती ।। ज्ञानेश्वरी ।।या गोड गोड बोलण्याची दिवसांपासून। आपणही भगवंताचे गोड नाम घेण्यास सुरुवात करु या...- डॉ.कैलास पाटील, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक