शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

गोड तुझे नाम विठोबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:36 IST

विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की, त्याला उपमाच नाही

ठळक मुद्देकलीयुगात फक्त ‘हरिनाम’ हा एक उत्तम मार्ग आहे.

या वर्षी मात्र १५ जानेवारीला मकरसंक्रांत येत आहे. यामुळेच या वर्षी प्रयागला होणारा कुंभमेळा देखील १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. यादिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी सूर्य दक्षिणायनातून ते उत्तरायणात प्रवेश करतो. महाभारतात भीष्माचार्यांनी आपला देह त्यागासाठी मकर संक्रांतीचा काळ निवडला होता.मकर संक्रांतच्या दिवशी महाराष्टÑात एकमेकांना तीळ, गुळ दिला जातो. विद्वानांच्या मते काही शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व देखील आहे. वारकरी परंपरेचे पाया, संत ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाच्या नामाला गोड म्हटले आहे. जसं मकर संक्रांतीच्या दिवशी ‘गोड गोड बोला’ हे म्हटल जातं, त्याच प्रमाणे वारकरी सांप्रदायात नेहमीसाठी म्हटल जातं.गोड तुझे नाम विठोबा आवडले मज । दुजे उच्चारिता मना वाटतसे लाज ।।संत ज्ञानेश्वर हे योगी परंपरेचे, संत नामदेवांनी त्यांचा गौरव करताना म्हटले आहे, साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली ।असे असतांना देखील संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, ‘गोड तुझे नाम’ विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की, त्याला उपमाच नाही, वारकरी परंपरा ही नामाच्या अधिष्ठानावर उभी आहे. संत ज्ञानोंबापासून तर संत निळोबारायापर्यंत सर्व वारकरी संतांनी नामालाच प्रधान मानले आहे. ज्ञानोबाचा नामावर सुलभ, सरळ आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ‘हरिपाठ’ प्रसिद्ध आहे. हरिपाठाचा गोडवा म्हणजे ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा।’ संत ज्ञानोबांनी तर एका अभंगात स्पष्ट केले.सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहता। नाम आठविता रुपी प्रकट पै झाला ।।ज्या दिवशी प्रेमाने श्री विठ्ठलाचे नाम आठवले, त्याच दिवशी तो प्रगट झाला आणि हाच सोनियाचा दिवस आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. संत निळोबाराय तर नाम आणि श्रीविठ्ठलाशिवाय काहीच मानत नाही.सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी भगवंताचे नाम हे कलियुगात महत्वाचे म्हटले आहे,श्री विठ्ठलाचे नाम इतकं गोड आहे की, आज हजारो वर्ष झाली तरी त्याची गोडी कमी झालेली नाही तर उलट वाढतच आहे आणि वाढतच राहणार. महाराष्टÑात वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा सांप्रदाय आहे. योग, याग, तप, यज्ञ वगैरे याला महत्व न देता फक्त नामाला महत्व आहे. संत निळोबांनी सांगितले आहे क ी,नेणती काही टाणा टोणा । कुठलाही धागा नाही, दोरा नाही फक्त श्रीविठ्ठलाचे नाम. संत तुकाराम महाराज म्हणतात,प्राणिया रे एक बीज मंत्र उच्चारी । प्रतिदिनी रामकृष्ण म्हण का मुरारीया अभंगाद्वारे संत तुकोबा, फक्त मानवालाच नाही तर सर्व प्राणीमात्राला सांगतात की, रामकृष्ण हा बीज मंत्र आहे आणि प्रतिदिन याचा आपल्या वाचेने उच्चार करा, यातच या कलीयुगात सर्वांचे कल्याण आहे. आणि हेच साधन उत्तम आहे. उपवास, धुम्रपान, पंचाग्नीसाधन वगैरे वारकऱ्यांसाठी नाही, असा बीज मंत्र सर्व संतांनी सांगितला आहे. कलीयुगात फक्त ‘हरिनाम’ हा एक उत्तम मार्ग आहे. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितले आहे.कृष्ण विष्णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।माझी आत्मयची । उदंड गाती ।। ज्ञानेश्वरी ।।या गोड गोड बोलण्याची दिवसांपासून। आपणही भगवंताचे गोड नाम घेण्यास सुरुवात करु या...- डॉ.कैलास पाटील, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक