चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:50 IST2017-12-02T15:46:02+5:302017-12-02T15:50:27+5:30
शेतकऱ्यांकडून ऊस पुरवठा करण्याबाबत टाळाटाळ होण्याची भीती असल्याने कारखान्याने सुरु केला उपक्रम

चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप
आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.२ : गेल्या वर्षी थकीत असलेल्या ऊसाचे पेमेंट शेकºयांना चोपडा साखर कारखान्याच्या कर्मचाºयांनी शेतात जाऊन वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी ऊस उत्पादकांना पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी कारखान्याला ऊस देण्यासाठी मागे पुढे करीत असल्याने कारखान्याने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षाचे ऊस उत्पादक शेतकºयांचे ऊसाचे प्रति टन ३०० रुपये चोसाकाकडून धनादेश द्वारा वितरित करणे सुरू आहे. काही शेतकºयांनी यंदा ऊस दिल्यास ऊसाचे पैसेच मिळणार नाहीत, म्हणून ऊस इतर कारखान्यांना देणे सुरू केले आहे. बाहेरील कारखान्यास ऊस जाऊ नये व चोसाका कडे शेतकºयांनी ऊस द्यावा यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे थेट गेल्या वर्षी ३०० रु घेणे असलेल्या शेतकºयांच्या शेतात जाऊन धनादेश वितरित करीत आहेत. वर्डी ता.चोपडा येथील ऊस उत्पादक शेतकरी व सरपंच राजेंद्र शिंदे यांच्या शेतात शनिवार २ रोजी जाऊन ३०० रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर ऊस तोड मुकादम ट्रकसह चोपडा कारखान्याला रवाना झाला.