शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गिरीश भाऊ का जादू चल गया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:58 IST

मनपा निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे.

ठळक मुद्देजळगाव महापालिकेत घडविला इतिहासभाजपाला मिळवून दिले दणदणीत यशखडसे समर्थक ६ पैकी ५ उमेदवार पराभूत

जळगाव : मनपा निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. जामनेरच्या निवडणुकीत १०० टक्के यश महाजन यांनी मिळवून दिले, त्यानंतर पालघर, नाशिकमध्येही त्यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.जळगाव मनपाची निवडणूकही त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली. इतर निवडणुकांप्रमाणे येथेही त्यांनी यश मिळवून दिल्याने गिरीश भाऊ का जादू चल गया... अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या.ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती कमळ घेतलेले सर्वचे सर्व १६ नगरसेवक मनपा निवडणुकीत विजयी झाले आहेत तर अन्य पक्षातून शिवसेनेत गेलेले तिघे उमेदवार पराभूत झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर १८ विद्यमान नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. यापैकी १६ नगरसेवकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली व सर्व विजयी झाले. त्यात शिवसेनेतून भाजपात गेले महापौर ललित कोल्हे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे, माजी उपमहापौर भारती सोनवणे, राष्टÑवादीचे गटनेते सुरेश सोनवणे आदींनी विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मुख्तारबी रसूल पठाण, भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे तसेच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र हे तिघेही पराभूत झाले. या सर्व आयाराम गयारामांकडे जळगावकरांचे लक्ष होते.खडसे समर्थक ६ पैकी ५ उमेदवार पराभूतमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ६ समर्थकांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाला जबरदस्त यश मिळाले असताना सुनील माळी, अशोक लाडवंजारी, सुनील खडके, रवींद्र पाटील, शरिफा तडवी, अनिल देशमुख या ६ खडसे समर्थकांपैकी केवळ सुनील खडके हे विजयी झाले तर इतर ५ जण पराभूत झाले. पराभूतांपैकी सुनील माळी हे भाजपाचे मनपातील गटनेते तर रवींद्र पाटील आणि अनिल देशमुख हे विद्यमान नगरसेवक होते. भाजपाच्या विजयाच्या लाटेचा अनेक नवख्यांनाही लाभ झाला असताना या विद्यमानांना त्याचा फायदा होवू शकला नाही, यावरही राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.मराठा समाजाचे भाजपाचे १२ उमेदवार विजयीभाजपाने मराठा समाजातील १४ उमेदवार दिले होते. यापैकी १२ उमेदवार निवडून आले. यामुळे मराठा समाजही भाजपाच्या बाजूने उभा राहिला असा दावा, पक्षातर्फेच करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची नाराजी भाजपाला भोवणार असे बोलले जात असताना याचा परिणाम झाला नसल्याचाही दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.विद्यमान ४६ पैकी ३१ नगरसेवक विजयी १५ पराभूतविद्यमान ४६ नगरसेवक रिंगणात होते. त्यापैकी ३१ नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली तर १५ नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. यामध्ये श्यामकांत सोनवणे, जयश्री नितीन पाटील, पृथ्वीराज सोनवणे, वर्षा खडके, अमर जैन, दीपाली पाटील, सुनील माळी, लीना पवार, रवींद्र पाटील, संगीत दांडेकर, अनिल देशमुख, अश्विनी देशमुख, चेतन शिरसाळे, ममता कोल्हे, लता मोरे यांचा समावेश आहे.खडसेंना जमले नाही ते महाजनांनी करुन दाखविलेजलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मनपा निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. जे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना जमले नाही ते महाजन यांनी करुन दाखविले. त्यांच्या या यशामुळे जिल्हा नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या विजयाचे गिफ्ट म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तसेच राज्याचे गृहमंत्रीपदी त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकGirish Mahajanगिरीश महाजन