शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गती कुंठविणारे महामार्गाचे चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:50 IST

सर्वाधिक महामार्गांची घोषणा झालेला खान्देश सध्या बंद पडलेल्या, संथ गती झालेल्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे त्रस्त झाला आहे. राष्टÑीय महामार्ग विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडील माहिती बाहेर येणे दुरापास्त झाले आहे.

मिलिंद कुलकर्णीनितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय भूपृष्ठ विभाग असल्याने महाराष्टÑात महामार्गांची कामे मंजूर होतील, हे अपेक्षित होते. तसेच झालेही. खान्देशात तब्बल १६ हजार कोटी रुपयांच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांना सुरुवात झाली. राष्टÑीय महामार्ग क्र.६, बºहाणपूर-अंकलेश्वर, औरंगाबाद-जळगाव, औरंगाबाद-चाळीसगाव-धुळे, जळगाव-नांदगाव अशा रस्त्यांचा त्यात समावेश होता. ही कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात खासदार, अधिकारी यांनी दाखवली नाही. हे वास्तव आहे.राष्टÑीय महामार्ग क्र.६ म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर ते जळगाव जिल्ह्यातील चिखली या गावापर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. कामासाठी वेगवेगळे तुकडे केले, तरी काम पूर्ण होत नाही. नवापूर ते फागणे काम कुठे पूर्ण तर कुठे अपूर्ण आहे. फागणे ते तरसोद या टप्प्याचे काम चार महिन्यांपासून बंद आहे. तरसोद ते चिखली या रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. जळगाव ते औरंगाबाद काम ठप्प झाले आहे. जळगाव ते नांदगाव हे काम आता सुरु झाले आहे.प्रवासाचा वैतागमहामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी रस्ते खोदणे, निम्म्या भागात भर टाकणे, पुलासाठी वळण रस्ता करणे अशी कामे सुरु आहेत. धूळ, खड्डे याचा मोठा त्रास प्रवासी आणि रहिवासी असा दोघांना होत आहे. कामे बंद पडल्यानंतर पुन्हा कधी सुरु होतील, याची खात्री नसल्याने खड्डे असलेल्या रस्त्यातून वाट शोधावी लागत आहे. नाताळाच्या सुट्या, लग्नसराई असल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खान्देशातील भाजपाच्या चौघा खासदारांना कोणता विषय अडचणीचा ठरेल, याची यादी करायची म्हटली तर पहिल्या क्रमांकाचा विषय हा महामार्ग असा राहील. नितीन गडकरी यांच्यासारखा तडफदार भूपृष्ठ वाहतूक मंत्री लाभलेला असतानाही, त्यांच्या खात्याचा उपयोग खान्देशसाठी करुन घेण्यात चौघाही खासदारांना मोठे अपयश आले आहे, हे नमूद करायला हवे.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, दुसऱ्यांदा संधी मिळालेले ए.टी.पाटील, कुटुंबियांचा राजकीय वारसा लाभलेले डॉ.हीना गावीत, रक्षा खडसे या चौघा खासदारांनी महामार्गाच्या विषयाला पुरेसा न्याय दिला नसल्याची भावना बळावत चालली आहे. नवापूर ते फागणे या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. जळगाव जिल्ह्यातून जाणाºया या महामार्गाचे चौपदरीकरण तर ‘नाट’ लागल्यासारखे झाले आहे. एल अँड टी सारख्या प्रतिष्ठीत कंपनीला काम सोडण्याची वेळ का आली, हे समोर आले तर भल्या भल्यांचे बुरखे टराटरा फाटतील. पाच वर्षे हे काम रखडल्यानंतर फागणे ते तरसोद आणि तरसोद ते चिखली अशा दोन टप्प्यात निविदा काढून हे काम सुरु करण्यात आले. फागणे ते तरसोद काम सुरु झाले तर तरसोद ते चिखली काम सुरुच झाले नव्हते. आता पहिले बंद पडले तर दुसºया टप्प्यातील काम सुरु झाले. जळगाव ते नांदगाव दरम्यान रस्त्याचे काम वेगात सुरु झाले, तर जळगाव ते औरंगाबाद रस्त्याचे काम बंद पडले.ही कामे बंद का पडली,याविषयी अधिकृत आणि ठोस माहिती कुणीही देत नाही. वित्तीय संस्थांनी कंत्राटदारांना देऊ केलेला कर्जपुरवठा तूर्त थांबविला आहे, असे एक कारण शासकीय अधिकारी ‘खाजगी’त सांगतात. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभाग असल्याने ‘पोलादी पडदा’ प्रभावी आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तर तेही होत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरु आहेत.ज्याठिकाणी कामे सुरु आहेत, त्याठिकाणी प्रचंड धुळीने पिकांचे नुकसान होत आहे. बंद आहे तेथे रस्ते खोदून ठेवल्याने, भर टाकल्याने अरुंद रस्त्यावरुन वाहतूक सुरु असल्याने कोंडी, वाहनांचे नुकसान, अपघात असा त्रास आहे. कंत्राटदार आणि शासकीय अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने कोठेही कामे सुरु होतात, कुठलेही काम थांबविले जाते असे प्रकार सुरु आहेत.विकासाभिमुख असलेल्या मंडळींकडून थोडी कळ सोसा, चांगल्यासाठी होत आहे, असा अनाहूत सल्ला हमखास दिला जातो. पण ‘अंधेरनगरी, चौपद राजा’सारखा कारभार सुरु असेल तर नागरिकांनी काम कान, डोळे, तोंड बंद करुन बसायचे काय? महामार्गाचे काम मंजूर होताच, तातडीने झाडे तोडण्याची मोहीम अगदी आणीबाणीप्रमाणे केली जाते. त्यात स्वार्थ असतो. पण कामे बंद पडल्यानंतर हा उत्साह जातो कोठे? महामार्ग पूर्ण झाल्यावर करारात नमूद केल्याप्रमाणे झाडे लावण्याच्या नियमाकडे डोळेझाक कशी होते? धुळ्यातून जाणाºया मुंबई महामार्गाच्या भोवती किती झाडे लागली? लागलेली किती जगली, याचे लेखापरीक्षण कोण करणार?जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा निघाल्याचा आनंदोत्सव साजरा केला गेला. आंदोलनांनी किमान सरकारला जाग आली. पण निविदा निघूनही कामे ठप्प झाली, त्यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल काय? निविदा निघूनही मंत्रालयात मंजुरीविना पडलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या फाईलसाठीही आंदोलन करावे लागेल काय? केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांना सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना कळत नाही, त्यांना केवळ आंदोलनाची भाषा कळते, हे सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रत्येक घटक आता आंदोलनाच्या मानसिकतेत आला आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेच्यादृष्टीने ही घातक अशी बाब आहे. लोकशाही दिन, माहिती अधिकार, मुख्यमंत्रीमित्र अशा उपक्रमांमधूनही सरकारांना जर जनभावना कळून येत नसतील, तर सरकारचे कान, डोळे, तोंड आणि एवढेच काय डोके तपासण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Jalgaonजळगावhighwayमहामार्ग