शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

आगामी दोन आठवड्यात उष्णतेच्या लाटेसह पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST

पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. ...

पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. जळगाव शहराचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. २३ ते २८ एप्रिल जिल्ह्यात तापमानाचा कहर निर्माण होण्याची शक्यता असून, या काळात तापमान ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही दिवस ढगाळ वातावरण कायम झाल्याने तापमानातदेखील घट झाली होती. शहराचा पारा गेल्या आठवड्यात ३८ अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र पुन्हा तापमानात वाढ होऊन तापमान आता ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. उत्तर भारतातील राजस्थान व गुजरात या भागाकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे लूसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, तापमान या हंगामातील उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत तापमान वाढले तर दुपारच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीअंशी चाप बसतो. मात्र तापमानाचा वाढीमुळे कोरोना सोबतच नागरिकांना उष्माघाताचा धोकादेखील वाढला आहे. यामुळे नागरिकांनी काही दिवस घरातच राहून बाहेर विनाकारण फिरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सर्वाधिक तापमान

शहरात सकाळी ९ वाजेपासूनच तापमानात वाढ होत असून, रात्री ८ वाजेपर्यंत उष्ण झळांनी नागरिकांना घरात बसणेदेखील कठीण झाले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता शहराचा पारा सर्वाधिक ४१ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे या काळात नागरिकांनी घरातच थांबण्याची गरज आहे. यासोबतच शहरात गेल्या आठवडाभरापासून ताशी १२ ते १४ किमी उष्ण वारे वाहत असून, यामुळेदेखील उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घरातून निघताना कानावर रुमाल लावूनच निघाले असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मे महिन्यात मात्र अवकाळीचे संकट

एप्रिलअखेरपर्यंत जिल्ह्यात तापमानाचा कहर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तर १ मेनंतर पुन्हा जिल्हाभरात अवकाळी पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. जागतिक हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम वातावरणाचा हंगामावर होताना दिसून येत आहे. तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढून चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, यामुळे जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मेअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.