शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आगामी दोन आठवड्यात उष्णतेच्या लाटेसह पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST

पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. ...

पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. जळगाव शहराचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. २३ ते २८ एप्रिल जिल्ह्यात तापमानाचा कहर निर्माण होण्याची शक्यता असून, या काळात तापमान ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही दिवस ढगाळ वातावरण कायम झाल्याने तापमानातदेखील घट झाली होती. शहराचा पारा गेल्या आठवड्यात ३८ अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र पुन्हा तापमानात वाढ होऊन तापमान आता ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. उत्तर भारतातील राजस्थान व गुजरात या भागाकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे लूसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, तापमान या हंगामातील उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत तापमान वाढले तर दुपारच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीअंशी चाप बसतो. मात्र तापमानाचा वाढीमुळे कोरोना सोबतच नागरिकांना उष्माघाताचा धोकादेखील वाढला आहे. यामुळे नागरिकांनी काही दिवस घरातच राहून बाहेर विनाकारण फिरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सर्वाधिक तापमान

शहरात सकाळी ९ वाजेपासूनच तापमानात वाढ होत असून, रात्री ८ वाजेपर्यंत उष्ण झळांनी नागरिकांना घरात बसणेदेखील कठीण झाले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता शहराचा पारा सर्वाधिक ४१ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे या काळात नागरिकांनी घरातच थांबण्याची गरज आहे. यासोबतच शहरात गेल्या आठवडाभरापासून ताशी १२ ते १४ किमी उष्ण वारे वाहत असून, यामुळेदेखील उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घरातून निघताना कानावर रुमाल लावूनच निघाले असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मे महिन्यात मात्र अवकाळीचे संकट

एप्रिलअखेरपर्यंत जिल्ह्यात तापमानाचा कहर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तर १ मेनंतर पुन्हा जिल्हाभरात अवकाळी पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. जागतिक हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम वातावरणाचा हंगामावर होताना दिसून येत आहे. तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढून चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, यामुळे जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मेअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.