शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सतत दोन दिवस लागलेल्या आगीने ‘अंबरीश’ होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:24 IST

अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लावली. त्यामुळे येथील झाडे होरपळलीच, शिवाय काही वन्यजीवही या आगीत होरपळल्याचे समजते.

ठळक मुद्देनवव्यांदा लागली आग.समाजकंटकाने लावल्याचा संशय,अनेक वृक्ष जळाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : हिरवळ आणि निसर्ग सौंदर्याने बहरत असलेल्या अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लागल्याने अतिशय संतप्त भावना निसर्गप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

हिरवळीने भरलेल्या श्री अंबरीश महाराज टेकडीवर ३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत चार वर्षांपूर्वी अमळनेर येथील डॉक्टरांच्या आयएमए संघटनेच्या सहयोगाने लावलेली वड, पिंपळ, निंब आदी १५ ते २० फूट वाढलेली ३० झाडे या आगीत होरपळली.

नुकतीच या वृक्षांची पानझड होऊन पालवी फुटली होती. याठिकाणी वन्यजीव देखील असल्याने काही ससे व त्यांची पिल्लेदेखील भस्म झाली. याशिवाय वृक्षाला असलेली अनेक घरटी यात जळाल्याने पक्षांची पिल्लेही मरुन पडली. याठिकाणी १५ ते २० फूट पेटलेल्या गवतातही वणवा पेटल्याने सरपटणारे प्राणी यात जळून खाक झाले आहेत.

आगीमुळे टेकडीच्या निसर्गसौंदर्यालादेखील बाधा पोहोचली आहे. आगीची वार्ता शहरात पसरल्यानंतर निसर्गप्रेमींसह टेकडी ग्रुप सदस्यांनी लागलीच टेकडीवर धाव घेतली, तोपर्यंत नगर परिषदेचा अग्निशमन बंबदेखील पोहोचला. नितीन खैरनार व अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. सुदैवाने टेकडीवर ही आग ब्रेक होऊन टेकडीच्या खाली न वळल्याने मोठे नुकसान टळले आहे.

तब्बल नवव्यांदा लावली आग

दि. ३ रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी फटाके फोडल्याने ही आग लागली. चार मुले पळाली तर ४ रोजीदेखील पुन्हा साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. त्यावेळी देखील काही तरुण तेथून पळाल्याचे समजले. याआधीदेखील आगीमुळे मोठे नुकसान वृक्षांचे झाले आहे. 

टेकडीवर रिकामटेकड्यांना बंदी घाला

श्री अंबरीश महाराज टेकडीवर दररोज सकाळी टेकडी ग्रुपचे सदस्य रहात असल्याने झाडे सुरक्षित राहतात. मात्र दुपारी व सायंकाळी अनेक लफडेखोर, दारुडे आणि गंजोडे यांचा याठिकाणी राबता असतो. याशिवाय अनेकजण पार्ट्या खील उडवत असतात. त्यामुळेच असे कृत्य करणाऱ्यांना संधी मिळत आहे. टेकडी वाचवायची असेल तर प्रशासनाने टेकडीवर दुपारनंतर रिकाम टेकड्याना बंदी आणावी आणि विनापरवानगी होणाऱ्या पार्ट्या बंद कराव्यात, अशी मागणी टेकडी ग्रुपने केली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरfireआग