शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

फतवे बहु झाले : अंमल कधी होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 1:06 PM

कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर, मृत्यूदर देशापेक्षा अद्यापही दुप्पट, रुग्णालये, सुविधा वाढल्या तरी रुग्णांचे हाल थांबत नाही, कामचुकार, स्वार्थी मंडळींविरोधात कठोर पावले उचलावी लागणार 

मिलिंद कुलकर्णीकोरोनाविरुद्ध लढा चार महिन्यांपासून सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत पायाभूत सुविधा वाढत असल्या तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांची तोकडी संख्या कायम आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. केद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी राज्यातील जळगावसह १० जिल्ह्यांमधील मृत्यूदराविषयी काळजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात या जिल्ह्यांमध्ये ७९ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. देशाचा मृत्यूदर २.०७ तर राज्याचा ३.४७ आहे. जळगावचा मात्र ४.५१ टक्के आहे. तो कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवणे, रुग्णांना वेळीच उपचार मिळणे या पध्दतीने धारावी, मालेगावमध्ये साथ आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. जळगावात येऊन गेलेल्या केद्रीय समितीच्या दोन्ही पथकांनी, आरोग्य मंत्र्यांनी याच बाबींवर भर देण्याची सूचना केली होती. खाटा व रुग्णवाहिकेचे नियोजन, खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालयात कॅशलेस सुविधा, अव्वाच्या सव्वा बिले आकारली जाणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरजदेखील केद्र व राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांनी वेळोवेळी अधोरेखित केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश काढले की, त्याप्रमाणे जिल्ह्यात पथके तयार होतात. लेखापरीक्षकांची नियुक्ती केली जाते. हेल्प डेस्क, वॉररुम तयार केल्या जातात. पण वास्तव वेगळेच आहे. अलिकडे दूरसंचार क्रांतीमुळे व्हीडिओ काढून रुग्णांचे नातेवाईक रुग्णालय, विलगीकरण कक्षातील दूरवस्थेवर प्रकाश टाकतात, पीपीई किटचा अव्वाच्या सव्वा दर लावणाºया खाजगी रुग्णालयाचे बिल समाज माध्यमाद्वारे समोर येते, रुग्णवाहिका, शववाहिका नसल्यास होणारे हाल चित्रित होऊन समाजापुढे येतात. कागदावरील परिस्थिती आणि वास्तव यातील जमीन अस्मानाचा फरक अशाप्रकारे दिसून येतो. या किरकोळ तक्रारी असल्याचा दावा नेहमी प्रशासनाकडून केला जातो. प्रशासनाची ही मानसिकता मुळात आक्षेपार्ह आहे. मोजक्या लोकांमध्ये लढण्याचे, अन्यायाला वाचा फोडण्याचे धारिष्टय असते. बाकी सगळे गुमान सहन करीत असतात. रुग्णाच्या प्रकृतीपेक्षा अधिक काही नाही, असे म्हणत अवाढव्य यंत्रणेपुढे झुकतात.  तक्रारी आल्या तर त्याविषयी शंका उपस्थित करण्याची रुढ मानसिकता प्रशासकीय यंत्रणेमध्ये तयार झालेली आहे. आधी ती दूर करण्याची आवश्यकता आहे. एक तक्रार असेल तरी तिचे निवारण व्हायला हवे. दोषी असेल तर कठोरपणे शिक्षा व्हायला हवी. हे सगळे पारदर्शकपणे जनतेसमोर यायला हवे. खाजगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिले आकारु नये, म्हणून लेखापरीक्षक नेमण्यात आले. आठवडाभरात या पथकांनी काय काम केले, हे लोकांना कळूद्या. खाटा आणि रुग्णवाहिकांचे नियोजन करावे, असा आग्रह सारे धरत आहे. ते जगजाहीर करा. समाजमाध्यमांवर टाका. कोविड रुग्णालय, खाजगी रुग्णालय, जनआरोग्य योजनेतील रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, हे लोकांना कळले तर त्यांना रुग्णाला घेऊन येता येईल. रुग्णवाहिकांचे दर आणि उपलब्धतेचे ठिकाण निश्चित करा. ते जाहीर करा, म्हणजे अधिक दर घेतल्यास तक्रार करता येईल. प्रशासनाने कठोरपणे पावले उचलल्यास यंत्रणेतील कामचुकार आणि यंत्रणेबाहेरील स्वार्थी लोकांना दहशत बसेल. ही साथ आटोक्यात येण्यास ही कार्यवाही सहाय्यभूत ठरु शकेल. दिल्ली, मुंबई, मालेगावात कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत असताना खान्देशात परिस्थितीमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. लोकसहभागातून आॅक्सिजन बेड, विलगीकरण कक्षाची सुविधा झाली आहे. खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांवर करीत आहेत. आरटी-पीसीआरसोबत रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट सुरु झाल्या आहेत. हे सकारात्मक चित्र आहे. केद्र व राज्य सरकार रुग्णांच्या सोयीसाठी रोज नवनवे फतवे काढत आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर होत आहे. परंतु, तरीही रुग्णांचे हाल थांबत नाही. भरारी पथके, लेखापरीक्षकांची नियुक्ती करुनही पाठपुरावा होत नसेल तर हाती काय येणार? 

टॅग्स :Jalgaonजळगाव