शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

राज्यातील शेतकरी दीन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:02 IST

देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर

देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर आहे़ या पार्श्वभूमीवर आपण कृषी दिन साजरा करीत आहोत याचे दु:ख होत आहे. ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कृषी दिन साजरा करण्यात येतो ते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या काळात शेतकरी राजा होता व आज तो ‘दीन’ (गरीब)का झाला याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे़ गेल्या ४०-४५वर्षाआधीचे शेतमालाचे भाव उदा:- कापूस- रूपये ३०० प्रती क्विंटल, ऊस - रूपये २६० प्रतिटन, व त्याकाळी सोन्याचा भाव:- रूपये ३००प्रती तोळा (त्याकाळचं १२ग्रॅम) असा होता. आज सोने आहे रूपये ३५००० प्रती तोळा(१०ग्रॅम) म्हणजे ११६पट वाढ झाली व कापूस आहे रूपये ५०००प्रति क्विंटल फक्त १६पट वाढ व ऊस रूपये २१००प्रतिटन म्हणजे ८ पट वाढ. याचाच अर्थ ज्यावर जगाची अर्थव्यवस्था आहे त्या सोन्याचे भाव शेतमालाच्या भावापेक्षा १००पट जास्त वाढले हा फरक़ तुलनेत शेती चा उत्पादन खर्च हा कसा वाढला ते बघणे देखील महत्वाचे आहे. त्या काळी रासायनिक खतांची थैली ५-७ रूपयांना मिळायची. मजुरी दर रूपये १-२प्रती दिन तर विजेचे दर नाममात्र, वाहतूक एस टी चे भाडं ५पैसे प्रती किमी होता. आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च हा किमान १००पट वाढला. याचाच अर्थ शेतमालाचा उत्पादन खर्च हा सोन्याच्या किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे किमान १००पट वाढला व शेतमालाचे बाजारभाव फक्त १५ते २० पटच वाढले म्हणजे ८०पट तूट व तेवढा तोटा दरवर्षी वाढत गेला व त्यानेच शेतीचे अर्थशास्त्र बिघडले. वाढते कर्ज व या जीवनाच्या चक्रव्यूह मध्ये अडकलेले शेतकऱ्याच्या डोक्यात आपसूकच आत्महत्येचा विचार येतात.- एस. बी. पाटील , सदस्य, सुकाणू समिती़

टॅग्स :Jalgaonजळगाव