शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकरी दीन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:02 IST

देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर

देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर आहे़ या पार्श्वभूमीवर आपण कृषी दिन साजरा करीत आहोत याचे दु:ख होत आहे. ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कृषी दिन साजरा करण्यात येतो ते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या काळात शेतकरी राजा होता व आज तो ‘दीन’ (गरीब)का झाला याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे़ गेल्या ४०-४५वर्षाआधीचे शेतमालाचे भाव उदा:- कापूस- रूपये ३०० प्रती क्विंटल, ऊस - रूपये २६० प्रतिटन, व त्याकाळी सोन्याचा भाव:- रूपये ३००प्रती तोळा (त्याकाळचं १२ग्रॅम) असा होता. आज सोने आहे रूपये ३५००० प्रती तोळा(१०ग्रॅम) म्हणजे ११६पट वाढ झाली व कापूस आहे रूपये ५०००प्रति क्विंटल फक्त १६पट वाढ व ऊस रूपये २१००प्रतिटन म्हणजे ८ पट वाढ. याचाच अर्थ ज्यावर जगाची अर्थव्यवस्था आहे त्या सोन्याचे भाव शेतमालाच्या भावापेक्षा १००पट जास्त वाढले हा फरक़ तुलनेत शेती चा उत्पादन खर्च हा कसा वाढला ते बघणे देखील महत्वाचे आहे. त्या काळी रासायनिक खतांची थैली ५-७ रूपयांना मिळायची. मजुरी दर रूपये १-२प्रती दिन तर विजेचे दर नाममात्र, वाहतूक एस टी चे भाडं ५पैसे प्रती किमी होता. आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च हा किमान १००पट वाढला. याचाच अर्थ शेतमालाचा उत्पादन खर्च हा सोन्याच्या किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे किमान १००पट वाढला व शेतमालाचे बाजारभाव फक्त १५ते २० पटच वाढले म्हणजे ८०पट तूट व तेवढा तोटा दरवर्षी वाढत गेला व त्यानेच शेतीचे अर्थशास्त्र बिघडले. वाढते कर्ज व या जीवनाच्या चक्रव्यूह मध्ये अडकलेले शेतकऱ्याच्या डोक्यात आपसूकच आत्महत्येचा विचार येतात.- एस. बी. पाटील , सदस्य, सुकाणू समिती़

टॅग्स :Jalgaonजळगाव