शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पूर ओसरेलही, अश्रूंना बांध कसे घालायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

चाळीसगाव : ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ असं म्हणत प्रशासनासह सर्वच गाफील राहिल्यास काय दाणादाण उडते. हे बुधवारी पहाटे चाळीसगावच्या ...

चाळीसगाव : ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ असं म्हणत प्रशासनासह सर्वच गाफील राहिल्यास काय दाणादाण उडते. हे बुधवारी पहाटे चाळीसगावच्या डोंगरी व तितूर नदीला आलेल्या पुराने सहप्रमाण सिद्ध केले आहे. यशाचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच चढाओढ असते; मात्र अपयशाला खांदा द्यायला कुणीही तयार नसतो. त्यामुळे आपत्तीचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी अगामी काळात स्पर्धाही सुरु होईल.

संकटे ही नैसर्गिक असली तरी मानवी हस्तक्षेपांमुळे ती जीवघेणीही ठरत आहेत. चाळीसगावी डोंगरी व तितूर नदीला आलेल्या पुराला मानवी हस्तक्षेपाचाही लोंढा आहेच. हे नाकारता येत नाही. पूर ओसरेलही पण ज्यांचे सर्वस्व पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्या अश्रूंना बांध कसा घालायचा ? हा प्रश्न मन सुन्न करुन टाकतो. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनासह आमदार मंगेश चव्हाण हे रस्त्यावर उतरुन नागरिकांना धीर देताना दिसून आले.

शहरात दत्तवाडी भागात डोंगरी व तितूर नदीचा संगम होऊन पुढे तितूर नदी वाहत जाते. या परिसरात शिवाजी घाट, भाजी मंडईसह मोठी नागरी रहिवास आहे.

गेल्या काही वर्षांत नदीची पावसाळ्यापूर्वी होणारी मशागत येथे झालेली नाही. नदी खोलीकरण, गाळ उपसा, स्वच्छता याबाबत आनंदीआनंद आहे. पालिका प्रशासन तर ही आमची जबाबदारीच नाही अशा भूमिकेत दिसते. सूर्यनारायण मंदिरालगत नदी सुशोभीकरणासाठी मध्यंतरी दगडांचे मोठे भराव टाकून एक लोखंडी पूल उभारण्यात आला; मात्र या पुलाला दोन्ही बाजूने प्रवेशासाठी जागाच नसल्याने हेच का ते सुशोभीकरण? असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.

दगडांचा भराव केल्याने पाण्याचा जोर वाढल्याने पुराचे पाणी थेट पूर्णपात्रे हाॅस्पिटलसह तहसील कार्यालयजवळील वीर सावरकर चौकांपर्यंत पोहोचले होते. स्टेशन रोडलगतच्या गल्ल्यांमध्येही ते घुसले. येथे दुचाकी व चारचाकी वाहने जलमय झाली होती.

दुसरा मुद्दा नदीतील अतिक्रमणाचा आहे. नदीचे बहुतांशी पात्र अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. खरजई रोडलगतच्या वीटभट्ट्या असोत की भाजी मंडई लगतच्या दुकानांची अतिक्रमणे. नदीच्या मूळ नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. साहजिकच बुधवारी आलेल्या पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसून हाहाकार उडाला. नव्या व जुन्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने उर्वरित शहराचा संपर्क तुटला. वीजपुरवठा खंडित झाला. पावसाळ्यापूर्वी पूररेषा नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देणे, ही पालिका प्रशासनाची कामे आहेत. मात्र हे सर्व कागदावरच राहिले, असा संतप्त सूर बुधवारी दिवसभर व्यक्त होत होता.

तितूर नदी हिरापूर रस्त्यालगत तळेगावकडून वाहत येते. या नदीत ठिकठिकाणी सांडपाणी सोडल्याने तितूरची केव्हाच गटारगंगा झाली आहे. तितूरची जशी कोंडी झाली आहे. तशीच स्थिती पाटणादेवीच्या धवलतीर्थ डोहातून उगम पावलेल्या डोंगरीचीही झाली आहे. या नदीचा शहरात प्रवेश बामोशी बाबांच्या दर्गाहाला स्पर्श करुन होतो. बाबांच्या दर्गाहात वर्षभर भाविकांचा राबता असल्याने नदीपात्रातच फुले, शिरणी, पूजा साहित्याची दुकाने थाटलेली असतात. परगावाहून आलेले भाविक येथे नदीपात्रातच झोपड्या उभारुन राहतात. पुढे रिंगरोडलाही नदीपात्रालगत ठिकठिकाणी रहिवाशांनी अतिक्रमणे केली आहेत. दोन्ही बाजूने नदीपात्रे आकसल्याने बुधवारी आलेल्या पुराच्या पाण्याने थेट १० ते १५ फूट उंचीवर असलेल्या बामोशी बाबांच्या समाधीपर्यंत धडक दिली. हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पुराचे पाणी घाटरोडपर्यंत शिरले होते. याच पुरात दुकानदारांचे साहित्य तर नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू, जनावरे वाहून गेली. पूर ओसरल्यानंतर आता पूरग्रस्तांचे डोळे वाहू लागले आहेत. यातून काही बोध घेतला तर ‘देर आये दुरुस्त आये’, असे होईल. नाही तर आहेच ‘नेमेचि येतो मग पावसाळा.’