शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातही ट्रॅव्हल्सला घरघर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST

सुनील पाटील जळगाव : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवात देखील खासगी ट्रॅव्हल्सला घरघर कायम ...

सुनील पाटील

जळगाव : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवात देखील खासगी ट्रॅव्हल्सला घरघर कायम असून प्रवाशी मिळत नसल्याने ट्रॅव्हल्स मालकांनी भाडे कमी केले, तरी देखील त्यांना प्रवाशी मिळत नाही. राखी पौर्णिमेला देखील अशीच परिस्थिती होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी गणेशभक्तांनी कोरोनामुळे या उत्सवाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या असो की बाहेरगावावरुन जळगावला येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला प्रवाशीच मिळत नाहीत. त्यामुळे एकूण बसेसच्या संख्येत निम्मेच बस नियमित धावत असून त्यादेखील पूर्ण क्षमतेने धावत नाहीत, त्यामुळे काही वेळा डिझेलचा खर्च निघणेही अवघड झालेले आहे. प्रवाशी आकर्षित करण्यासाठी पूर्वी पेक्षा भाड्यात कपात करण्यात आली आहे. बस रस्त्यावर धावायला लागली म्हणजे टॅक्स भरावाच लागतो. मग प्रवाशी मिळो अथवा ना मिळो.

जळगावातून एकट्या पुण्यासाठी ५० ते ५५ बसेस पूर्वी रोज धावत होत्या, आता ही संख्या २२ ते २३ च्या घरात आहे. मुंबई, सुरत, अहमदाबाद, इंदूरला जाणाऱ्या बसेसची संख्या घटली आहे. इंदूर व नागपूरसाठी तर फक्त एकच बस धावत आहे, त्यात देखील प्रवाशी मोजकेच असतात. त्यामुळे भाड्यातही कपात करण्यात आली आहे. तरी देखील प्रवाशांचा प्रतिसाद नाही. प्रवाशांअभावी निम्मेपेक्षा जास्त ट्रॅव्हल्स बस घरीच उभ्या आहेत.

असे आहे ट्रॅव्हल्सचे भाडे

मार्ग पूर्वी आता

जळगाव-पुणे ६५० ५००

जळगाव-मुंबई ७०० ७००

जळगाव-सुरत ६०० ५००

जळगाव-नागपूर ९०० ९००

जळगाव-इंदूर ६०० ५००

या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स

जळगाव-पुणे

जळगाव-मुंबई

जळगाव-सुरत

कोट....

डिझेल दरवाढीमुळे व्यवसायात तोटा

कोरोनामुळे प्रवाशीच मिळत नाही. कधी कधी तर निम्मेही प्रवाशी नसतात तर एकीकडून बस रिकामीच धावते. एस.टी.पेक्षा जास्त कर शासनाला भरतो, तरी देखील पार्सल व इतर बाबींची परवानगी मिळत नाही. कोरोनामुळे या व्यवसायाचे कंबरडे मुडले आहे. व्यवसायला प्रतिसाद नसल्याने बसेस घरीच थांबविल्या आहेत.

-सुशील नेटके, ट्रॅव्हल्स बस मालक

कोट...

डिझेलच्या दरात दरवर्षी वाढ होते. करात देखील शासन वाढ करतच असते. चालक, क्लिनर व हेल्पर यांना पगार द्यावाच लागतो. त्या तुलनेत प्रवाशी मिळत नाहीत. बहुतांश मालकांच्या ट्रॅव्हल्स बस उभ्याच आहेत. ट्रॅव्हल्स मालक, चालक व त्यावर अवलंबून असलेला सर्वच वर्ग संकटात आलेला आहे.

-प्रमोद झांबरे, ट्रॅव्हल्स मालक

प्रवाशी काय म्हणतात.....

कोट...

जळगाव-मुंबईचे रेल्वेचे आरक्षण व ट्रॅव्हल्सचे भाडे जवळपास सारखेच आहे. कोरोनामुळे प्रवाशी संख्या कमी असल्याने ट्रॅव्हल्सची बुकिंग लगेच होते, त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास आज तरी परवडत आहे.

- सुनील भागवत पाटील, प्रवासी

कोट...

सुरत मार्गावर रेल्वेगाड्या कमी आहेत. त्यात आरक्षण लगेच मिळत नाही. ट्रॅव्हल्सचे भाडे कमी असल्याने तो पर्याय निवडला. सध्या ट्रॅव्हल्समध्येही जास्त प्रवाशी नाहीत. दोन्ही बाजुंनी ट्रॅव्हल्सनेच प्रवास केला. आर्थिकदृष्ट्या तो परवडला देखील.

-पृथ्वीराज पाटील, प्रवाशी