शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लॉकडाऊनमुळे दीड लाख हेक्टरवर रब्बी हंगाम कापणी-विक्री रखडत रखडतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:50 IST

अडीच लाख हेक्टरपैकी शिल्लक दिड लाख हेक्टरवरील ज्वारी, दादर, मका, गहू या धान्यवर्गीय व हरभरा आदी डाळवर्गीय पिकांची कापणी पुरेशा मजुरांअभावी व विक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच सुरू आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरचे चित्रविक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात नेमका जिल्ह्यातील रब्बी हंगाम ऐन कापणीला आला. जवळजवळ अडीच लाख हेक्टरपैकी शिल्लक दिड लाख हेक्टरवरील ज्वारी, दादर, मका, गहू या धान्यवर्गीय व हरभरा आदी डाळवर्गीय पिकांची कापणी पुरेशा मजुरांअभावी व विक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच सुरू आहे. याशिवाय शेतमालाचा हमीभाव व प्रत्यक्ष शेतक-यांना मिळणारा भाव यात ५०० ते १००० रु.ची तफावत असल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.कापणीच्या दिवसात हजारोने जिल्ह्यात येणारा सातपुडा, मध्य प्रदेशातील मजुर लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकून पडला आहे ते स्थानिक मजूर ज्वारी-बाजरी कापणार की मका कणसे खुडणार? या द्वंद्वात सापडले आहेत. यात धान्य जमिनीवर गळून पडण्याची चिंता व्यक्त होतेय. कापणी-खुडणीचे दर एकरी ४५०० हजारावरुन ६-७ हजारावर गेले आहेत. लॉकडाऊनमुळे स्थानिक मजुरांना वाढत्या तापमानात पायातील चप्पल, अंगावरील कपडे विकत घेण्याची व्यवस्था नसल्याने, कापणीच्या हंगामात या छोट्या-छोट्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहे. वाढत्या तापमानामुळे पीक कापणीला मर्यादा पडत आहेत. लॉकडाऊनमध्ये इतर उद्योगधंदे बंद असताना कृषी क्षेत्रात मोठा रोजगार उपलब्ध असताना याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या प्रमुख पिकांमधे हरभरा वगळता इतर धान्याची शासकीय खरेदी नाही. शिवाय हमीभाव तर मिळतच नाही. चाळीसगावसारख्या कृऊबा समित्या लॉकडाऊन काळात बंदच तर अमळनेर, पाचोरा, पारोळा, धरणगाव कृऊबा समित्या बंद-चालू अशी विक्री व्यवस्था आहे. यामुळे धान्य तुंबत आहे. काही मध्यवर्ती गावातून धान्याची खेडा खरेदी सुरू आहे. लॉकडाऊन काळात खेडा खरेदी हा पर्याय चांगला ठरतो. मात्र भाव कमी दिला जातो. शिवाय पेमेंट ८-१० दिवसांच्या उधारीवर आहे.चारा बेभावमागील दुष्काळात ज्वारी कडबा मिळत नव्हता. आहे तो ३५०० ते ५००० रु. शेकडा विकला गेला. यावेळेस ५०० रुपये शेकडा इतका खाली आला आहे. मका, बाजरी चारा तर कुणीही विचारत नसल्याची स्थिती लॉकडाऊन काळातील ‘जिल्हाबंदी’मुळे झाली आहे.केळीला व्यापारी देईल तो भाव, कपाशी घरातमागील वर्षी केळीला या दिवसात एक हजार ते दीड हजारांचा दर क्विंटल मागे मिळाला. आता व्यापारी देईल त्या पडेल भावात केळी विकली जात आहे. २०० ते २५० रुपये क्विंटल भाव तरी कापण्यासाठी धडपड सुरू आहे. टरबूज, भाजीपाला याची एकतर थेट विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे किंवा ते पीक सोडून द्यावे लागत आहे. आजही चाळीस टक्के कापूस विक्रीअभावी शेतकºयांच्या घरात पडून आहे. खेडा खरेदी बंदच आहे. शासकीय कापूस खरेदी थंड बस्त्यात आहे.खरीप तोडांवर आलाय. पीककर्जाचे नाव नाही. आहे त्या शेतमालाची कापणी- विक्री वांध्यात आहे. शेतमजुरांना शासनाकडून धान्य मिळालेय. आता मीठ-मिरची पुरताच कमवा अशी त्यांची धारणा झालीय. शेतकरी हा शासन व शेतमजुराच्या कात्रीत सापडल्याची स्थिती लॉकडाऊन काळातील एक महिन्यात आहे.लॉकडाऊन काळात पिकांच्या कापणीची समस्या सार्वत्रिक आहे. शासनाने रोजगार हमीतून मजुरांना ही कामे लावावीत. याशिवाय रब्बी पिकांची हमीभावाने शासकीय खरेदी केली तरच शेतकरी वाचेल. पीककर्जा तत्काळ मिळण्याची व्यवस्था करावी. ग्रा.पं.नीदेखील तसा ठराव करुन शासनाला पाठवावेत.-विजय जावंदीया, शेती अभ्यासक व संघटना नेतेभाजीपाला, फळे थेट विक्रीसाठी शेतकºयांना कृषी खात्यांतर्गंत पास दिला जात आहे. याशिवाय कृषी केंद्रधारक, ठिबक साहित्य आदी विक्रीधारकांनादेखील तसा पास दिला जात आहे.-बी.बी.गोराडे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव