शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

जळगावात निपाहची धास्ती अन् वटवाघळांची वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:35 IST

जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शिरकाव नाही मात्र दक्षता म्हणून आरोग्य केंद्रांना सूचनाजळगावातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्तीउद्यानात येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. दरम्यान, जिल्ह्यात निपाहचा कोठेही शिरकाव नसला तरी दक्षता म्हणून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्कतच्या सूचना दिल्या आहेत.केरळमध्ये निपाह व्हायरची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बाधीत वटवाघळांच्या मूत्र व लाळेमुळे हा व्हायरस पसरत असल्याचे समोर आले आहे, असे असले तरी जळगावात एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या वटवाघळांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नेहमी अबाल वृद्धांची वर्दळ असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील झाडांवर वटवाघळांची मोठी संख्या दिसून येत आहे. बाधीत वटवाघळाच्या लाळेमुळेच हा व्हायरस पसरण्याची धास्ती असल्याने उपाययोजेची मागणी होत आहे.धुळे जिल्ह्यात घेतले नमुने‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर शेजारील धुळे जिल्ह्यात खबरदरी म्हणून वराहांचे रक्तनुमने घेण्यात आले आहेत. तसेच वटवाघूळ असलेल्या झाडांखाली चुना टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जळगावात वटवाघूळ असलेल्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही.आरोग्य केंद्रांना सतर्कतेच्या सूचना‘निपाह’ व्हायरसचा जिल्ह्यात कोठेही शिरकाव नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. असे असले तरी दक्षता म्हणून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, शहरातील स्थितीबाबत व उपाययोजनांबाबत मनपाचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.तो मेंदूवर थेट हल्ला करतो त्यामुळे ताप येणे थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात.लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील २४ ते ४८ तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृदयाच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे आढळून येते.ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे ७ ते १० दिवस आढळतात.सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित त्रास होतोसध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही.अशी घ्या काळजीपडलेली फळंं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा.वैद्यकीय मदत करणाºया व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा.अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूJalgaonजळगाव