शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी शेतकरी बापाचे हाल पाहावेना, रोजगारासाठी नेपाळचे अल्पवयीन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

जळगाव : कष्टकरी बापाचे हाल पाहवत नसल्याने कुटुंबाला आपल्याकडून देखील हातभार लावला जावा यासाठी नेपाळ येथील दोघा अल्पवयीन मुलांनी ...

जळगाव : कष्टकरी बापाचे हाल पाहवत नसल्याने कुटुंबाला आपल्याकडून देखील हातभार लावला जावा यासाठी नेपाळ येथील दोघा अल्पवयीन मुलांनी रोजगारासाठी घर सोडले. मात्र अपेक्षित काम न मिळाल्याने जळगावात दाखल झालेल्या या मुलांनी रेल्वे स्टेशनवरच मुक्काम ठोकला. पोलिसांनी या मुलांची चौकशी केल्यानंतर दोन्ही मुलांची कहाणी समोर आली. दोघांची समजूत घालत त्यांना जळगावातील बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे. अमित आणि संजय अशी या अल्पवयीन बालकांची नवे आहेत.

नेपाळमधील भगवानपूर हे अमितचे गाव असून रोटोवद हे संजयचे गाव आहे. यात अमितचे शिक्षण हे इयत्ता ३ री पर्यंत झाले असून, संजय हा शाळा शिकलेला नाही. मात्र दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती ही सारखीच असल्याने त्यांनी आपल्या शेतकरी बापाला मदत करण्यासाठी गेल्या महिन्यात घर सोडले. विशेष म्हणजे नेपाळ सोडून,पहिल्यांदा थेट मुंबई गाठली. या ठिकाणी गावातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून एका कपड्यांच्या दुकानावर काही दिवस त्यांनी कामही केले. मात्र, मुंबईतील रहदारी आणि त्यात खाण्याची ना राहण्याची व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे त्या दोघांनी मुंबई सोडून जळगाव गाठले.

इन्फो :

जळगावातही बालकांनी कामासाठी केली फिरफिर

‘पोटासाठी दाही दिशा’ या म्हणीप्रमाणे अमित आणि संजय यांनी मुंबई सोडून जळगाव गाठले आणि जळगावातही कुठे काम मिळेल का?, याचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र अनोळखी चेहरे आणि त्यात शहराची कुठलीही माहिती नसल्यामुळे या बालकांना जळगावातही कुठेही काम मिळाले नाही.

इन्फो :

अन् पोलिसांनी काढली बालकांची समजूत

जळगावात कामासाठी सर्वत्र फिरफिर होऊनही, हाताला काम न मिळाल्यामुळे हताश झालेली ही बालके जळगाव स्टेशनवर मुक्कामाला थांबली होती. विशेष म्हणजे या बालकांजवळ पैसे नव्हते. या बालकांवर स्टेशनवरील रेल्वे पोलिसांची नजर पडली. त्यांनी बालकांकडे केलेल्या चौकशीत दोन्ही बालक रोजगारासाठी जळगावात आल्याचे समजले. पोलिसांनी या बालकांना पुन्हा गावी जाऊन शिक्षण घेण्याबाबत समजूत काढली. यानंतर बालकांसाठी काम करणाऱ्या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून या बालकांना जिल्हा बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे.

इन्फो :

स्टेशनवर सुरक्षेसाठी असतांना ही दोन्ही बालके फिरताना आढळून आली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते नेपाळहून काम करण्यासाठी आधी मुंबईत आणि आता जळगावात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही बालके अल्पवयीन असल्यामुळे त्यांना, त्यांचे आई-वडील घेण्यासाठी येईपर्यंत जिल्हा बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे.

-सचिन भावसार, तपासी अंमलदार,जळगाव लोहमार्ग पोलीस