शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कष्टानेच बनते जीवन समृद्ध - प्रा.डॉ. प्रभाकर चौधरी

By admin | Updated: April 30, 2017 13:42 IST

वीकेण्ड या सदरात प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी संस्कारदीप या विषयावर केलेले लिखाण.

श्रावस्तीनगरातील दोन युवक वाईट संगतीत सापडले. ते लोकांचे खिसे कापू लागले. लोकांना ठगवू लागले, फसवू लागले. ते एखाद्या दु:खी माणसास बघत, तेव्हा त्याला तंत्रमंत्राच्या आधाराने सुखी बनविण्याचे आश्वासन देऊन ठकवित. एका दिवशी त्यांनी अनेक लोकांना बुद्धांच्या प्रवचन ऐकायला जाताना बघितले, ते दोघेही तेथे गेले. त्यांच्यापैकी एकाच्या कानावर जसे बुद्धांचे शब्द पडले, तो त्या मधूर वाणीनं आकर्षित झाला. तो शांतपणे बुद्धांचे प्रवचन ऐकत होता. दुस:याने त्या दरम्यान श्रोत्यांचे खिसे साफ केले. परत येताना खिसे कापणा:याने दुस:याला विचारले, ‘‘तुला काय मिळाले रे.’’

तो म्हणाला, ‘‘मी बुद्धांच्या उपदेशामुळे कोणाचाही खिसा कापला नाही.’’
हे ऐकून तो खिसेकापू उपहासानं म्हणाला, ‘‘अरे मुर्खा, तू उपदेशानं प्रभावित होऊन स्वत:ला धर्मात्मा म्हणत आहेस. अरे, आपलं व कुटुंबीयांचं पोट का त्यामुळे भरेल?’’
मित्राच्या उपहासात्मक शब्दांनी मात्र तो श्रोता डगमगला नाही. उलट त्यानं त्याची सोबत सोडली. दुस:या दिवशी तो पुन्हा बुद्धांचा उपदेश ऐकायला गेला. सत्संग संपल्यावर हा श्रोता तथागतांजवळ गेला. त्याने मित्राशी झालेली बेकी आणि आपल्या पूर्वायुष्याबद्दल त्यांना सांगितले. नंतर त्याने विचारले, ‘‘मला कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी काय करायला पाहिजे?’’
तथागत म्हणाले, ‘‘आपल्या हातांचा सदुपयोग करून मजुरी कर. सात्विक जीवन जग. मित्रानं तुला मूर्ख म्हटलं, पण तू मूर्ख नाहीस. तू शहाणा झाला आहेस. तो कुकर्मी मात्र मूर्ख आहे.’’
काही दिवसांनी तो खिसेकापू मित्र शिपायांकडून पकडला गेला. त्याची रवानगी तुरुंगात झाली. शहाणा झालेला तरुण मात्र त्या शहरातील एक प्रतिष्ठित माणूस म्हणून गणला जाऊ लागला.
निष्कर्ष- कष्टानेच जीवन समृद्ध बनते. श्रमाला चांगल्या विचारांचीही जोड असावी.