जळगाव - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची विचारपूस केल्यानंतर या दौऱ्यावरून आरोप प्रत्यासोर सुरू झालेले आहेत. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजनांचीउद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तसेच हा दौरा म्हणजे उद्धव ठाकरेंचा नाटकीपणा, असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावल आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संधी होती तेव्हा घरातून बाहेर पाय काढला नाही, आता नाटकं कशाला? उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे साप निघून गेल्यावर जमिनीवर काठी आदळण्याचा प्रकार होय, असा चिमटा गिरीश महाजन यांनी यावेळी काढला.