शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावकरांना गूळ प्रकल्प तारणार

By admin | Updated: April 10, 2017 00:45 IST

अंजनीचे पाणी आटले : तापीचे पाणी संपण्याच्या मार्गावर, धावडा डोहाचे पाणी या महिन्यापुरतेच

धरणगाव : शहराला पाणीपुरवठा करणा:या अंजनी नदीचे पाणी संपल्याने सध्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी शहराला मिळत आहे. हे पाणीही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आता शहराला गूळ प्रकल्पाचे पाणी  तारणार आहे. असे असले तरी धरणगावासीयांच्या मनात आतापासूनच धाकधूक निर्माण झाली आहे.पाणी असो वा नसो, बाराही महिने बारा दिवसाआड पाणी शहरवासीयांच्या नशिबी आहे. त्यातल्या त्यात मार्च, एप्रिल, मे आाणि जून हे चार महिने शहराला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे होते. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यार्पयत धावडा डोहात पाणी राहील, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र मे व जून महिन्यासाठी गूळ प्रकल्पाचे पाणी शहराला तारणार असल्याचे चित्र आहे.150 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षितगूळ प्रकल्प हा चोपडा व धरणगाव तालुक्याचा तारणहार मानला जातो. याच प्रकल्पातून   दोन्ही तालुक्याची तहान भागविली जाते. धरणगाव शहरासाठी गेल्या वर्षी या प्रकल्पातून तीन आवर्तन मिळाले होते. या वर्षासाठीही या प्रकल्पातून 150 दशलक्ष घनफूट पाणी जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवले आहे. त्यामुळे आता महिनाअखेर्पयत या प्रकल्पातून पाणी सोडण्याची गरज भासेल असा अंदाज आहे.पालिका प्रशासनाचे आवाहनशहराला ज्या तापी पात्राच्या धावडा डोहातून पाणी पुरवले जाते त्या पात्रातील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सुरेखा विजय महाजन, मुख्याधिकारी सपना वसावा यांनी पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. पाणी संपण्याच्या मार्गावर असल्याने शहरात रिक्षा  फिरवूृन पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.आवर्तनाची मागणी करणारया महिनाअखेर्पयत धावडा डोहाचे पाणी संपण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे येत्या 15 ते 20 एप्रिलदरम्यान जिल्हाधिका:यांकडे शहरासाठी राखीव कोटय़ातून  आवर्तन सोडण्याची मागणी   पालिका प्रशासन करणार आहे. यावर्षी दोन आवर्तन लागतील        की तीन हे आज सांगणे कठीण झाले आहे.  नेते असतानाही समस्या धरणगाव शहरात आधीच 12 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही पालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. दर 12 दिवसाआड होणा:या पाणीपुरवठय़ामुळे पाणी कसे पुरवावे ही समस्या भेडसावत असताना आणखी पाणी कसे काटकसरीने वापरावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वास्तविक सर्व पक्षांचे जिल्हा नेते धरणगाव शहरात आहेत. असे असताना पाणी प्रश्न सोडविला जाऊ नये, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.धरणगाव शहराला पाण्याची कमतरता भासू न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे आमचे नियोजन सुरू आहे. तापी पात्रातील पाणी संपले तरी गूळ प्रकल्पाचे पाणी शहरासाठी आरक्षित केले आहे. नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी यासाठी आम्ही आवाहन केले आहे.     -सलीम पटेल, नगराध्यक्ष, धरणगाव