शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते आणि मनपा प्रशासनाचा मृत्यू; आयुक्तांचे केले सांत्वन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST

जळगाव : अमृत आणि मलनिस्सारण योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचा खोदून-खोदून जीव घेतला गेला आहे. त्यामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली ...

जळगाव : अमृत आणि मलनिस्सारण योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचा खोदून-खोदून जीव घेतला गेला आहे. त्यामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. एवढेच नाही तर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेचासुद्धा मृत्यू झाला आहे, असा आरोप करीत माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यासह पाच ते सहा जणांनी बुधवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्याकडे दुखवटा व्यक्त करीत त्यांच्या दालनात ठिय्या मांडला.

शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दक्षा झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झाली असून, अमृत व मलनिस्सारण योजनेंतर्गत रस्त्यांचा खोदून-खोदून जीव घेण्यात आला आहे. तर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेचासुद्धा मृत्यू झाला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. रस्त्यांवर प्रचंड चिखल होत आहे. चिखलामुळे दुचाकी, सायकल घसरून अपघात होत आहेत. रोज कुणी ना कुणी जखमी होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा व यंत्रणेचा मृत्यू झाल्यासारखी अवस्था पाहता, आयुक्तांचे सांत्वन करण्यासाठी बुधवारी सकाळी दीपककुमार गुप्ता यांच्यासह अजय महाडिक, मतीन पटेल, विजय सांगोरे, राजेंद्र नन्नवरे, महेश पाटील, दीपक बाविस्कर, योगेश कदम, कवी कासार, अमोल कोल्हे आदींनी आयुक्तांचे कार्यालय गाठले होते. त्यानंतर गुप्ता यांनी शहरातील रस्त्यांची स्थिती आयुक्तांसमोर मांडली.

खड्ड्यांना वाहिली फुले

मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडल्यानंतर दीपककुमार गुप्ता यांच्यासह काही जणांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांना फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. मनपा परिसर, टॉवर चौक, तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील खड्ड्यांना फुले वाहण्यात आली, तसेच रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.