शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने लावली कापसाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:02 IST

हरताळे आणि परिसरातील स्थिती : आर्थिक फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदाच्या अति पावसानंतर दूषित हवामानामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. परिसरात अति पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना उरले सुरलेले कपाशीचे पीकही आता अळ्या पडल्याने वाया गेल्यासारखे आहे.कपाशीच्या कैरीला बोंड अळीमुळे पूर्ण कीड लागली आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे, अशी व्यथा प्रदीप काळे, सुनील तायडे, संजय ठाकूर,तसेच विकसनशील शेतकरी कृषी मित्र आनंदराव देशमुख यांनी मांडली आहे.यंदा सुरुवातीपासूनच आस्मानी संकटाने शेतकऱ्याची पाठ सोडली नाही. अति पावसाने हिरवा गार झालेल्या कापसाला शेवटी फुलपात्या आल्या होत्या मात्र काही कैºया लागल्यावर त्यातही बोंड आळ्या तयार झाल्याने ९० टक्के कापूस पुन्हा वाया गेला आहे. शेवटी तरी बहरलेल्या कापसाचा फायदा शेतकºयाला होईल अशी अपेक्षा होती मात्र शेवटच्या बहारने देखील शेतकºयाला तारले नसल्याची स्थिती या परिसरात आहे.नुकसानीचे पंचनामे शासनाने करून त्याची भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांदाही शेतातच सडल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, मका घरात येणपूर्वीच सडला होता. यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली असून दैंनंदिन गरजा भागविण्याचा प्रश्नही त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.शेवटी कापसाला चांगला बहार लागलेला असताना कैºयांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पुढील हंगामातही बोंड अळीची लागण जास्त होऊ शकते. शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले असून आर्थिक प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला आहे. शासनाने पिकविमा मंजूर करावा. पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी.-आनंदराव देशमुख, शेतकरी, हरताळा ता. मुक्ताईनगरबोंडअळीवर नियंत्रण करण्यासाठी शेतकºयांनी आता नीम तेल हे पंधराशे पीपीएम प्रति मिल प्रमाणे फवारणी करावी. शेतकºयांनी आता त्याच ठिकाणी दुबार पीक घेऊ नये , फवारणी करताना नाकातोंडात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर