शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

बागायती कापूस उत्पादक कमावतोय ४७ रूपये रोज: शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:42 AM

हमी भाव वाढविण्याची होतेय मागणी

ठळक मुद्दे शेतमजुरापेक्षाही परिस्थिती बिकटहमीभावाअभावी व्यापाºयांकडून लूटस्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी

सुशील देवकरजळगाव: खते, बियाणे, मजुरी, ठिबक,कीटक नाशके आदीचा मोठ्या प्रमाणावर खर्च व तुलनेने मिळणारा कमी हमीभाव यामुळे बागायती कापूस उत्पादकाला जेमते ४७ रूपये रोज पडेल इतकेच उत्पन्न मिळत आहे. शेतमजूर देखील २०० रूपये रोज कमवीत असताना बळीराजाची अवस्था त्याहून बिकट झाली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.शेतकºयाला चांगला हमी भाव देण्यास शासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत आली आहे. स्वामीनाथ आयोगाने उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली आहे. असे असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे बळीराजा व्यापाºयांकडून नागवला जात आहे. पडत्या भावाला माल खरेदी करायचा आणि परप्रांतात नेऊन जास्त भावाने विकून रग्गड पैसा कमवायचे उद्योग सुरू आहेत. त्यातच शेतकरी कर्जबाजारी झाला तर कशाला हवी कर्जमाफी? असे प्रश्न शेतीतील ओ-की-ठो कळत नसलेल्यांनी करावेत, असा दुर्देवाचा फेरा शेतकºयांच्या नशिबी आला आहे.असा होतो खर्चकापूस उत्पादकांचा होणार एकरी खर्चच एका शेतकºयाने सविस्तर मांडून मिळणारे उत्पन्न व त्यातून कापूस उत्पादक शेतकºयाला पडणारा रोज याचा ताळेबंदच सोशल मिडियावर टाकला आहे, त्याची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यात बागायती कापूस उत्पादकाला एका एकरला नांगरणीसाठी १००० रूपये, रोटाव्हेटर १००० रूपये खर्च येतो. ठिबकची किंमत किमान १५००० रूपये आहे. ते किमान तीन वर्ष टिकते. म्हणजेच वर्षाला ५ हजार रूपये खर्च येतो. सरी काढण्याची मजुरी ५०० रूपये, ठिबक बसविण्याची मजुरी १००० रूपये, बियाणे २ पाकीटे २ हजार रूपये, पेरणी मजुरी १ हजार रूपये, खतांसाठीपेरणीवेळी १ बॅग, पेरणीनंतर १ महिन्याने १ बॅग, माल धरण्यापूर्वी १ बॅग याप्रमाणे २७०० रूपये व टाकण्याचा खर्च २०० रूपये प्रमाणे ६०० रूपये असा एकूण ३ हजार रूपये खर्च येतो. कोळपणी किमान दोन वेळेचा खर्च २ हजार रूपये किमान एक खुरपणी १ हजार रूपये, किटकनाशकांच्या किमान ४ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एका फवारणीला हजार रूपये प्रमाणे ४ हजार रूपये खर्च येतो. जर निसर्गाच्या कृपेने कापूस उत्पादन चांगले आले तर जास्तीत जास्त एकरी १२ क्विंटल उत्पन्न मिळते. त्यासाठी ७ रूपये किलो प्रमाणे वेचणीसाठी ८४०० रूपये इतकी मजुरी लागते. तर शेवटी शेतात उरलेले खुंट शेताबाहेर काढण्यासाठी १ हजार रूपये खर्च येतो. याप्रमाणे एकरी सुमारे ३० हजार ९०० म्हणजेच ३१ हजार रूपये खर्च येतो.केवळ ४७ रूपये पडतो रोजशासनाकडून ३५०० ते ४ हजार रूपये क्विंटल भाव दिला जात आहे. ४ हजार रूपये भाव धरला तरी १२ क्विंटलला म्हणजेच एकरी ४८००० रूपये उत्पन्न मिळते. त्यातून ३१ हजार रूपये खर्च वजा जाता शेतकºयाच्या हाती केवळ १७ हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच १४११ रूपये महिना किंवा ४७ रूपये रोज या शेतकºयाला पडतो. त्याव्यतिरिक्त विहिरीवरील पंपांचे वीजबिल, शेतकºयाची स्वत:ची मेहनत वेगळीच.