शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

भुसावळात कोरोनाचा कहर, गर्दी टाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 23:18 IST

भुसावळात कोरोनाचा कहर असताना नागरिकांनी गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पॉझिटिव रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातील दोन रुग्ण मयत झाले असून, सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरवासीयांना विशेष दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, याच काळात रेशनिंग दुकानांवर धान्य उपलब्ध झाले  आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक बाहेर पडत असले, तरी हे धान्य वाटप तब्बल १० दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील समता नगर, आंबेडकर नगर, पंचशील नगर, सिंधी कॉलनी व शांतीनगर या भागात तब्बल आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. यातील पंचशील नगर व आंबेडकर नगरमधील प्रत्येकी एक - एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही शहरात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील हा परिसर सील करण्यात आला आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी राज्यासह शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.  सुरवातीचे चार-पाच दिवस वगळता शहरात सर्वत्र भाजी मार्केट, दुकाने आदींमध्ये गर्दी दिसून आली. यावेळी १४४ कलमाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी १८८ प्रमाणे अनेकांवर गुन्हे दाखल केले.  मात्र तरीही गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नाही. त्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यावरसुद्धा शहरातील नागरिक रस्त्यावर येणे थांबले नाही. त्यामुळे शहरात तीन दिवस बंद पाळावे, अशी गरज निर्माण झाली व तसा  मतप्रवाह पुढे आला. मात्र यातही शहरात राजकारण झाल्यामुळे शहरवासीय संभ्रमात पडले.दरम्यान , याच काळात रास्त भाव  दुकानावर  शासनातर्फे प्रथमत: गुलाबी रेशनिंग कार्डवर गहू व तांदूळ वाटप सुरू झाले.  मात्र हे वाटप किमान दहा-दहा दिवस तर सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतरही राहिलेल्या ग्राहकांना लाभार्थ्यांना द्यावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र तरीही शहरात हे रेशनिंग  मिळते किंवा नाही, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही नागरिक जीव धोक्यात टाकून रेशन धान्यासाठी  रस्त्यावर उतरले.धान्य साठ्या यासंदर्भात   पुरवठा अधिकारी अनभिन्नशहरात रेशनिंगची १२० दुकाने आहेत. या दुकानवर भगव्या रेशन कार्डावर वाटप करण्यासाठी गहू व तांदूळ आला आहे. मात्र गोडावूनमध्ये गहू व तांदूळ किती आला,  यासंदर्भात तहसीलदार दीपक धिवरे व पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना त्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगण्यात आले . तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना धान्य वाटप किती करायचे हे माहीत नसल्यामुळे नागरिक चकीत झाले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात गोडाऊनमधूनच जाणाऱ्या थैल्या कमी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी तक्रारी केली होती. त्यावरून पुरवठा विभाग वादात सापडला आहे. त्यात अद्यापही पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांना धान्यासंदर्भात  माहिती नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्या सावकारे यांच्या तक्रारींमध्ये  दम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ