शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढतोय; पण परीक्षा ऑफलाईन, पालक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पालक चिंतेत पडले आहेत. आधीच जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. जर कोरोना असाच वाढत राहिला तर विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा कशी घेणार आणि त्यावेळी नियम कसे पाळणार, असा प्रश्न पालकांच्या मनात उपस्थित होत आहे. मात्र आता त्याचे उत्तर प्रशासन कसे देणार?

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुरू असलेली शाळा आणि महाविद्यालये बंद केली. आता विद्यापीठदेखील ६ मार्चपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आकडेवारी

दहावी - ५९ हजार

बारावी - ४५ हजार

कोट -

दहावीच्या मुलांचे पालक

शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा का केली, हाच प्रश्न आहे. एकीकडे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लहान गावांमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचा जीव परीक्षेसाठी का धोक्यात टाकला जात आहे. हेच कळत नाही - वैशाली आंबटकर, पालक

कोरोना पुन्हा वाढतोय सध्या आम्ही घराबाहेर जाणे कमी केले आहे किंवा टाळले आहे. असे असताना सरकारला परीक्षा ऑफलाईन का घ्यायची आहे हेच कळत नाही. जशा महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. तशाच या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्या. - रवींद्र अस्वार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेत उत्तरपत्रिका हाताळणी, प्रश्नपत्रिका हाताळणी यामुळे जर कोरोना आणखीच पसरला तर त्याला जबाबदार कोण असेल. - वाल्मीक पाटील

बारावीचे पालक

कोरोना वाढतोय, मात्र तरीही सरकारला अद्याप ऑफलाईन परीक्षाच का घ्यायची, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आधीच कोरोना परीक्षा घेतोय आता त्यात सरकारला का मुलांची परीक्षा घ्यायची आहे - अरुण पाटील

सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या आधी कोरोनावर नियंत्रण ठेवावे. हीच प्राथमिकता आहे. परीक्षा ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. महाविद्यालयांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षाच होत आहेत. तेथे ऑफलाईन नाही. मग दहावी आणि बारावीच्या मुलांनाच का बोलावले जात आहे. : संदेश नेवे

कोरोनाच्या काळात सरकारला मुलांना परीक्षेला का बोलावायचे आहे, ते कळत नाही. परीक्षेच्या माध्यमातून आणखी संसर्ग वाढला तर ती परिस्थिती कशी सांभाळली जाणार? - सुरेश चौधरी