शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

कोरोना वाढतोय; पण परीक्षा ऑफलाईन, पालक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पालक चिंतेत पडले आहेत. आधीच जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. जर कोरोना असाच वाढत राहिला तर विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा कशी घेणार आणि त्यावेळी नियम कसे पाळणार, असा प्रश्न पालकांच्या मनात उपस्थित होत आहे. मात्र आता त्याचे उत्तर प्रशासन कसे देणार?

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुरू असलेली शाळा आणि महाविद्यालये बंद केली. आता विद्यापीठदेखील ६ मार्चपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आकडेवारी

दहावी - ५९ हजार

बारावी - ४५ हजार

कोट -

दहावीच्या मुलांचे पालक

शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा का केली, हाच प्रश्न आहे. एकीकडे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लहान गावांमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचा जीव परीक्षेसाठी का धोक्यात टाकला जात आहे. हेच कळत नाही - वैशाली आंबटकर, पालक

कोरोना पुन्हा वाढतोय सध्या आम्ही घराबाहेर जाणे कमी केले आहे किंवा टाळले आहे. असे असताना सरकारला परीक्षा ऑफलाईन का घ्यायची आहे हेच कळत नाही. जशा महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. तशाच या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्या. - रवींद्र अस्वार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेत उत्तरपत्रिका हाताळणी, प्रश्नपत्रिका हाताळणी यामुळे जर कोरोना आणखीच पसरला तर त्याला जबाबदार कोण असेल. - वाल्मीक पाटील

बारावीचे पालक

कोरोना वाढतोय, मात्र तरीही सरकारला अद्याप ऑफलाईन परीक्षाच का घ्यायची, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आधीच कोरोना परीक्षा घेतोय आता त्यात सरकारला का मुलांची परीक्षा घ्यायची आहे - अरुण पाटील

सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या आधी कोरोनावर नियंत्रण ठेवावे. हीच प्राथमिकता आहे. परीक्षा ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. महाविद्यालयांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षाच होत आहेत. तेथे ऑफलाईन नाही. मग दहावी आणि बारावीच्या मुलांनाच का बोलावले जात आहे. : संदेश नेवे

कोरोनाच्या काळात सरकारला मुलांना परीक्षेला का बोलावायचे आहे, ते कळत नाही. परीक्षेच्या माध्यमातून आणखी संसर्ग वाढला तर ती परिस्थिती कशी सांभाळली जाणार? - सुरेश चौधरी