शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोरोना वाढतोय; पण परीक्षा ऑफलाईन, पालक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पालक चिंतेत पडले आहेत. आधीच जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. जर कोरोना असाच वाढत राहिला तर विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा कशी घेणार आणि त्यावेळी नियम कसे पाळणार, असा प्रश्न पालकांच्या मनात उपस्थित होत आहे. मात्र आता त्याचे उत्तर प्रशासन कसे देणार?

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुरू असलेली शाळा आणि महाविद्यालये बंद केली. आता विद्यापीठदेखील ६ मार्चपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आकडेवारी

दहावी - ५९ हजार

बारावी - ४५ हजार

कोट -

दहावीच्या मुलांचे पालक

शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा का केली, हाच प्रश्न आहे. एकीकडे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लहान गावांमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचा जीव परीक्षेसाठी का धोक्यात टाकला जात आहे. हेच कळत नाही - वैशाली आंबटकर, पालक

कोरोना पुन्हा वाढतोय सध्या आम्ही घराबाहेर जाणे कमी केले आहे किंवा टाळले आहे. असे असताना सरकारला परीक्षा ऑफलाईन का घ्यायची आहे हेच कळत नाही. जशा महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. तशाच या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्या. - रवींद्र अस्वार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेत उत्तरपत्रिका हाताळणी, प्रश्नपत्रिका हाताळणी यामुळे जर कोरोना आणखीच पसरला तर त्याला जबाबदार कोण असेल. - वाल्मीक पाटील

बारावीचे पालक

कोरोना वाढतोय, मात्र तरीही सरकारला अद्याप ऑफलाईन परीक्षाच का घ्यायची, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आधीच कोरोना परीक्षा घेतोय आता त्यात सरकारला का मुलांची परीक्षा घ्यायची आहे - अरुण पाटील

सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या आधी कोरोनावर नियंत्रण ठेवावे. हीच प्राथमिकता आहे. परीक्षा ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. महाविद्यालयांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षाच होत आहेत. तेथे ऑफलाईन नाही. मग दहावी आणि बारावीच्या मुलांनाच का बोलावले जात आहे. : संदेश नेवे

कोरोनाच्या काळात सरकारला मुलांना परीक्षेला का बोलावायचे आहे, ते कळत नाही. परीक्षेच्या माध्यमातून आणखी संसर्ग वाढला तर ती परिस्थिती कशी सांभाळली जाणार? - सुरेश चौधरी