शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कोरोना वाढतोय; पण परीक्षा ऑफलाईन, पालक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पालक चिंतेत पडले आहेत. आधीच जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. जर कोरोना असाच वाढत राहिला तर विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा कशी घेणार आणि त्यावेळी नियम कसे पाळणार, असा प्रश्न पालकांच्या मनात उपस्थित होत आहे. मात्र आता त्याचे उत्तर प्रशासन कसे देणार?

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुरू असलेली शाळा आणि महाविद्यालये बंद केली. आता विद्यापीठदेखील ६ मार्चपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आकडेवारी

दहावी - ५९ हजार

बारावी - ४५ हजार

कोट -

दहावीच्या मुलांचे पालक

शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा का केली, हाच प्रश्न आहे. एकीकडे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लहान गावांमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचा जीव परीक्षेसाठी का धोक्यात टाकला जात आहे. हेच कळत नाही - वैशाली आंबटकर, पालक

कोरोना पुन्हा वाढतोय सध्या आम्ही घराबाहेर जाणे कमी केले आहे किंवा टाळले आहे. असे असताना सरकारला परीक्षा ऑफलाईन का घ्यायची आहे हेच कळत नाही. जशा महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. तशाच या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्या. - रवींद्र अस्वार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेत उत्तरपत्रिका हाताळणी, प्रश्नपत्रिका हाताळणी यामुळे जर कोरोना आणखीच पसरला तर त्याला जबाबदार कोण असेल. - वाल्मीक पाटील

बारावीचे पालक

कोरोना वाढतोय, मात्र तरीही सरकारला अद्याप ऑफलाईन परीक्षाच का घ्यायची, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आधीच कोरोना परीक्षा घेतोय आता त्यात सरकारला का मुलांची परीक्षा घ्यायची आहे - अरुण पाटील

सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या आधी कोरोनावर नियंत्रण ठेवावे. हीच प्राथमिकता आहे. परीक्षा ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. महाविद्यालयांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षाच होत आहेत. तेथे ऑफलाईन नाही. मग दहावी आणि बारावीच्या मुलांनाच का बोलावले जात आहे. : संदेश नेवे

कोरोनाच्या काळात सरकारला मुलांना परीक्षेला का बोलावायचे आहे, ते कळत नाही. परीक्षेच्या माध्यमातून आणखी संसर्ग वाढला तर ती परिस्थिती कशी सांभाळली जाणार? - सुरेश चौधरी