शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार व पणन संचालकांच्या आदेशानंतरही शुल्क वसुली सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:40 IST

जिल्ह्यातील केळी व्यापारीही त्रस्त : कृउबा बाहेरील कृषीमाल नियमनमुक्त होईना जळगाव : कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकºयांनी उत्पादीत केलेल्या ...

जिल्ह्यातील केळी व्यापारीही त्रस्त : कृउबा बाहेरील कृषीमाल नियमनमुक्त होईना

जळगाव : कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकºयांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा व या व्यवसायास चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील कृषी मालाच्या व्यवहारांवर शुल्क वसुली करू नये असे अद्यादेश काढत हे व्यवहार नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितींकडून शुल्क वसुली सुरूच असून याचा शेतकºयांना भुर्दंड बसण्यासह केंद्र सरकारच्या निर्णयालाही हरताळ बसत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पणन संचालनालयानेदेखील या संदर्भात आदेश काढून जिल्हा उपनिबंधक, बाजार समितींना पत्र देऊन याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यात काही व्यापारी या आदेशामुळे शुल्क देत नसून इतर व्यापाºयांनीही शुल्क देऊ नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे पिक असलेल्या केळीच्या व्यवहारातही या शुल्काची वसुली सुरूच असल्याने ही व्यापारी त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटात शेती क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे व शेतकºयांना आधार व्हावा म्हणून  केंद्र सरकारच्यावतीने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत विविध घोषणा केल्या. यामध्ये शेतकºयांनी उत्पादीत केलेल्या मालाला व व्यवसायाला चालना मिळण्यासाठी ‘उत्तेजन व सुविधाकरण’ या नावाने अद्यादेश (क्र. १०/२०२०, दि. ५ जून २०२०) जारी केला. यामध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र हे बाजार समिती आवार एवढे मर्यादीत ठेवून बाजार समितीबाहेरचे कार्यक्षेत्र सर्व शेतमालासाठी शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी नियमनमुक्त करण्यात आले. त्यामुळे देशातील कोणत्याही बाजार समितीने बाजार समिती आवाराबाहेरील व्यवसायावर शेतकरी, व्यापारी व अन्य घटकाकडून फी व लेव्हीची आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पणन संचालकांनी काढले आदेशकेंद्र सरकारच्या या अद्यादेशानंतर पणन सहसंचालकांनीही सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितींना पत्र देऊन (दि. २४ जून २०२०) याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. असे असले तरी याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर    पणन संचालनालयाचे संचालक सतीश सोनी यांनी १० आॅगस्ट रोजी आदेश काढून केंद्र सरकारच्या आदेशांच्या अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. वसुली सुरूचकेंद्र सरकारपाठोपाठ पणन संचालकांनी आदेश काढल्यानंतरही जिल्ह्यात ही वसुली सुरूच आहे. या संदर्भात वसुली थांबली तर कर्मचाºयांचा पगार कसा करावा, असा प्रश्न बाजार समितींकडून केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यांच्याकडून बाजार समिती आवार तसेच आवाराबाहेर पूर्वी ठरवून दिलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाºया शेतीमाल व्यवहारासाठी शुल्क वसुली केली जात आहे. १.०५ टक्के या प्रमाणे ही वसुली असून दरवर्षी सुमारे एकेका बाजार समितीकडून दोन ते अडीच कोटी रुपयांची वसुली होते.  केळी पट्ट्यात मोठा फटकारावेर, यावल तालुक्यात केळी उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात ही वसुली होत असते. शेतात माल भरल्यानंतर नाक्यांवर वाहने थांबवून त्यांच्याकडून प्रति वाहन ३०० रुपये शुल्क बाजार समितीकडून वसूल केले जाते. या आदेशानंतरही ही वसुली सुरू असून शेतकरीदेखील नाईलाजाने हे शुल्क देतात. या संदर्भात वसुली होत असल्याचे व्यापाºयांनी  सांगितले, मात्र नाव टाकू नये,स अशी विनंतीही केली. ही वसुली होत असल्याचे रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गोपाल महाजन यांनीही सांगितले, मात्र आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही, या विषयी बोलणे टाळून आपण बाहेर असल्याचे सांगितले. ----------------शुल्क वसुली केली नाही तर कर्मचाºयांचे पगार कसे करावे, असा प्रश्न आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. वसुली न करण्याचे शासनाचे आदेश आहे, त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्या जे व्यापारी देत नाही, त्यांच्याकडून वसुली होत नाही. - कैलास चौधरी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.  शेतीमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे अद्यादेश असण्यासोबतच पणन संचालकांनीही आदेश काढले आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी आता बाजार समितीबाहेर होणाºया शेतीमालाच्या व्यवहाराचे शुल्क भरू नये. - प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव. शेतीमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे अद्यादेश  मिळाले आहे. सध्या बाजार समितीकडून वसुली सुरू आहे. - गोपाल महाजन, सचिव, रावेर, कृषी उत्पन्न बाजार समिती. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव