शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

शहरातील ७५ उपनाल्यांच्या सफाईला सोमवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात ७५ उपनाले तसेच ५ मुख्य नाले असून या नाल्यांची स्वच्छता मोहिम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात ७५ उपनाले तसेच ५ मुख्य नाले असून या नाल्यांची स्वच्छता मोहिम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राबविली जाते. महापालिका आरोग्य विभागाकडून सोमवारपासून छोट्या नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.

पावासाळ्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ७५ छोट्या नाले सफाईला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. महापौर जयश्री महाजन यांनीदेखील याबाबत मनपा आरोग्य विभागाला मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्याबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सूचना दिल्या होत्या.

मुख्य नाले सफाई मक्तेदाराच्या माध्यमातून

शहरातील पाच मुख्य नाले असून त्यांची लांबी २३. २ कि. मी. आहे. त्यांची सफाई ही मक्तेदारांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविल्या असून त्या अंतिम टप्यात आहे. नाल्यांची सफाई ही जेसीबीच्या माध्यमातून केले जाणार आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती अधिकाऱ्यांकडून शहरातील मुख्य नाल्यांचा सफाईसाठीचे अंदाज पत्रक महापालिका आरोग्य विभागाकडे सादर केले असून लवकरच याबाबत देखील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन खाजगी ठेकेदाराला काम देण्यात येणार आहे.

शहरात मागील काही वर्षात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली. लेंडी नाल्याच्या पूरामुळे तर ममुराबाद रस्ता दिवसभर बंद राहीला होता. गेल्या पावसाळ्याच्या वेळेस शाहू नगरातील व मेहरुण परिसारात तुंबलेल्या गटारींचे पाणी ओव्हर फ्लो होवून काही घरांमध्ये घुसले होते. त्यामुळे यंदा त्याकडे गांभीयांने लक्ष देण्यात येत आहे.

नाल्यावरील अतिक्रमणावर कारवाई नाहीच

शहरातील अनेक मुख्य नाल्यांलगत अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी नाल्याचा काठावर झोपड्या तयार केल्या आहेत. २०१४ व २०१६ मध्ये पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी साचले होते. यामुळे मनपा आयुक्तांनी नाल्याचा काठावरील अतिक्रमण काढण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही कोणत्याही अतिक्रमणावर कारवाई मनपाकडून करण्यात आलेली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलन विभागाला हे अतिक्रमण करण्याबाबत आदेश दिले जातात मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे अनेक वर्षांपासून नाल्या लगतचे अतिक्रमण काढण्यात आलेले नाहीत.