शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्याच्या रत्नावतीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला ...

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला या नदीचे रौद्ररूप चोपडा शहरवासीयांनी अनुभवले आहे.

सांडपाणी व टाकाऊ वस्तू थेट नदीत

या नदीत सर्व रहिवासी घरांचे सांडपाणी गटारीमार्फत येत असते. तसेच याच नदीच्या पात्रात मासे व मटण विक्रेते उर्वरित टाकाऊ अवशेष टाकत असतात. भाजीपाला विक्रेते भाज्यांचे टाकाऊ व सडलेला भाग टाकतात. तसेच नागरिकही या नदीपात्रात प्लास्टिकचा केरकचरा टाकत असतात आणि अनेक नागरिक याच नदीच्या पात्रात प्रातर्विधीसाठी सकाळी येत असतात. म्हणून या रत्नावती नदीचे पात्र प्रदूषित बनले आहे. पावसाळ्यातील चांगला पाऊस पडल्यानंतर या नदीला पूर आल्यानंतर पात्र नदीच्या पाण्यानेच स्वच्छ होत असते.

नाल्यांचे पाणी येते नदीत

सर्व नाले याच नदीत येत असल्याने, नदीनाल्यांमधून बहुतांश कचरा हा या नदीपात्रात येत असतो. अरुणनगरमधून येणारा नाला, रामपुरा भागातून येणाऱ्या नाल्यामार्फत सर्वच घाण पाणी या नदीपात्रात येत असते. म्हणून या नदीचे पात्र हे प्रदूषित बनले आहे. यामुुळे पावसाळ्यात शहरात रोगराई पसरू शकते. ही नदी पहाडातून येत असल्याने प्रथम पुरात वृक्ष तोडून टाकले अवशेष या नदीच्या पाण्यासोबत वाहून येतात. हा काडी कचरा या नदीवर असलेल्या लहान पुलांच्या बोगद्यात अडकतात आणि तेथून पाणी तुंबते व शहरात पाणी घुसण्याची शिरण्याची शक्यता असते.

स्वच्छ भारत योजनेंतर्गत येथील पालिकेतील आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी दोन वर्षांपूर्वी एक दिवस येथील रत्नावती नदीपात्रातील घाणीची साफसफाई मोहीम राबवली होती. या विषयाकडे नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी लक्ष देऊन साफसफाई करण्यासाठी काहीअंशी प्रयत्न केले; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने कहर केल्याने नदी स्वच्छ करून गाळ कढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

५० लाखांची तरतूद

दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रत्नावती नदीचे संवर्धन व्हावे यासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नदीतून गाळ काढला जात नसून केवळ काटेरी झाडे-झुडपे मुळासकट काढली जात असतात. शहरात पाणी शिरू नये म्हणून या नदीच्या पात्राला खोल करून वाहणाऱ्या पाण्याला दिशा दिली जाते; परंतु सध्या खोलीकरण केले जात नसल्याने नदीपात्र अरुंद झाले आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने नदीला नदीचे रूप शिल्लक राहिलेले नाही. ही नदी गटारगंगा बनली आहे. या नदीपात्रात दोन्ही थडीला काँक्रीट रस्ता बनवून सुशोभीकरण करता येऊ शकते. मात्र, या विषयांची सत्ताधारी आणि विरोधकांना विसर पडला आहे. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार तरी खर्च होतो काय? याबाबत साशंकता आहे.

०५सीडीजे ६