शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मिरची उद्योगाला ‘कोरोना’चा ठसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:13 AM

कोरोनामुळे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. परिणामी नंदुरबार येथील मिरची उद्योग थंडावला आहे. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक रमाकांत पाटील...

महाराष्टÑात सर्वदूर परिचित असलेली नंदुरबारची मिरची आणि त्यावर सुरू असलेले येथील उद्योग सध्या ‘कोरोना’मुळे थंडावला आहे. परिणामी त्यावर आधारित सुमारे पाच हजार मजुरांचे हातही विसावले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होत आहे. गेल्या महिनाभरात हा उद्योग बंद असल्याने येथील कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण ठप्प झाले आहे.नंदुरबार म्हटले म्हणजे त्यासोबत येथील मिरचीचे नाव जोडले गेले आहे. देशात तामिळनाडूतील गुंटूरनंतर महाराष्टÑातील नंदुरबार येथील मिरचीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. हंगामात रोज सुमारे एक लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक सुरू असते. ओली मिरची खरेदी करून व्यापारी ते जमिनीवर वाळवतात. त्यामुळे मिरची वाळवण्यासाठी लागणाऱ्या पथाºया म्हणजे लक्षवेधी. लांब लांब दृष्टी जाई तोपर्यंत लालच लाल मिरचीचा सडा नजरेस पडतो. जसे लाल गालिचे टाकले असल्याचा भास होतो. ही वाळवलेली मिरची नंतर मिरची उद्योगात त्याची पावडर केली जाते आणि देशातील विविध भागात ती विक्री होते. नंदुरबार शहरात मिरची पावडर तयार करणारे सुमारे चाळीसपेक्षा अधिक उद्योग असून येथील मिरचीला सर्वदूर मागणी आहे.सध्या मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने उद्योगच बंद पडले आहेत. अर्थात मिरची पावडर उद्योग हे कृषीवर आधारित असल्याने सरकारची त्याला परवानगी असली तरी कोरोनामुळे आलेली बंधने आणि नियम पाळताना अनेक अडचणींना उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा बंद असलेलेच बरे, अशी अवस्था उद्योजकांची झाली आहे. पण उद्योग बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेले जवळपास पाच हजार मजूर आज बेरोजगार झाले आहेत. उद्योगच बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे अर्थकारणही ठप्प झाले असून आता कधी एकदाचे कोरोनाचे संकट दूर होईल अन् उद्योग सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.-रमाकांत पाटील, नंदुरबार

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnandurbar-acनंदुरबार