शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 5:01 AM

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची.

- विलास बारीजळगाव : मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्याच्या नावाखाली, शासनाने तीव्र कुपोषित मुलांना रेडी टू युज थेरपेटिक फूड म्हणून ‘ईझी नट पेस्ट पाकीट’ सुरू केले खरे; मात्र मुलांनाच ते आवडत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेली पाकिटे एकतर फेकली जातात किंवा गुरांना टाकली जातात. दुसरीकडे अंगणवाड्यांमध्ये बचत गटांकडून दिला जाणारा आहारदेखील बेचव असल्याची तक्रार आहे.

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची. त्यानंतर पोषण आहार शिजविण्याचा ठेका बचत गटांना दिला गेला. सध्या अंगणवाडीमध्ये ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांना एक दिवस वरणभात, तीन दिवस उपमा व शिरा आणि दोन दिवस कांदे पोहे व खिचडी देण्यात येते. मुलांच्या पोषणासाठी शासन बचत गटांना ८ रुपये अनुदान देते. त्यात ५० पैसे इंधनावर खर्च होत असून, ५० पैसे आहार तयार करणा-या बचत गटांना मिळतात. उर्वरित ७ रुपयांमध्ये तयार होणाºया आहारात कोणते पौष्टिक घटक राहणार? बेचव असणारा हा आहार बालक नाकारत आहेत. ‘पिवळा भात, मी नाही खात... का नाही खात, तर चव नाही त्यात,’ अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया बालकांची असते.

आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तीव्र कुपोषित बालकांना पेस्ट स्वरूपात आहार दिला जात आहे. दिवसातून किमान तीन पाकिटे देण्यात येतात. एका पाकिटाची किंमत २५ रुपये. याप्रमाणे दिवसाला किमान ७५ रुपये एका बालकावर खर्च होतात. आधीच्या व्हीसीडीसी योजनेत राज्यातील कुपोषित मुलांना १८ कोटी रुपयांमध्ये गरम ताजा आहार मिळत होता. आता या पेस्ट पाकिटांवर सुमारे २५ कोटी रुपये सरकार खर्च करीत आहे.ज्यांना हवे त्यांच्या वाट्याला किती?सहा महिने ते तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीतील मुलांसाठी तसेच शाळेत न जाणाºया किशोरवयीन मुली व गर्भवती मातांसाठी शासनातर्फे मुगाची डाळ, मसूरची डाळ, चवळी, हळद, मिरची व तेलाची पाकिटे दिली जातात. या पाकिटांमुळे कुपोषणमुक्तीला हातभार लागत असला, तरी हे पूर्ण अन्नघटक बाळ, किशोरवयीन मुली किंवा गर्भवतीच्या वाट्याला येतात का, असा प्रश्न आहे.आदिवासी मुलांचा आहार हा वेगवेगळा आहे. शून्य ते ६ वर्षे हा वयोगट मुलांच्या बौद्धिक वाढीचा असतो. त्यासाठी कुपोषित बालकांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. पेस्ट स्वरूपात देण्यात येणाºया आहाराची शिफारस कुणी केली? या आहारात त्रुटी असल्यास ते तपासण्याचे अधिकार कुणाला, हे सर्व निश्चित होणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजनेपेक्षा कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.- अ‍ॅड. बंड्या साने,खोज सामाजिक संस्था, मेळघाट.पेस्ट स्वरूपात देण्यात येणाºया या आहाराचा पूरक पोषण आहारात समावेश होतो. एका पाकिटातून बाळाला ४५ टक्के एनर्जी मिळते. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक यात आहेत. कुपोषित बालकाच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे उपयुक्त आहे.- डॉ. राजेंद्र पायघन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव