शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की शिवसेनेच्या वाघाचे गुरगुरणे बंद : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:43 IST

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देसरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणारभाजपा आणि सेना यांच्यातील कुरघोडी आणि कुरबुरीमुळे जनतेचे मनोरंजनसहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला.

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली.यावेळी ते म्हणाले की, शिवसेना दुतोंडी असून मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की, या वाघाचे गुरगुरणे बंद होते. भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षातील कुरघोडी आणि कुरबुरीच्या प्रकारामुळे फुकटचा तमाशा लोकांना पहायला मिळत आहे, असेही तटकरे म्हणाले.फक्त फसव्या घोषणा करण्यापलीकडे या सरकारने काहीच केलेल नसून शेतकºयाला अजुनही कर्जमाफी मिळालेली नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ३० हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. परंतु अद्याप ही मदत दिलेली नाही. आम्ही हल्लाबोल आंदोलनामध्ये शेतकरी आणि जनतेपर्यंत पोहचत असून सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सभाही न भूतो न भविष्यती अशा होत आहेत. सरकारविरोधात जनताच रस्त्यावर उतरत आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणारतटकरे म्हणाले की, शेतकºयांची कर्जमाफी, शेतकºयांच्या आत्महत्या आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या हे विषय येत्या अधिवेशनामध्ये आम्ही लावून धरणार आहोत. जोपर्यंत शेतकºयांना न्याय मिळत नाही आणि सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणार आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस