शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

केंद्रीय समितीने केला हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 9:22 PM

सहा पैकी एकाच ठिकाणी भेट : ठरल्याप्रमाणे पाहणी झालीच नाही

एरंडोल/ पारोळा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय समिती २२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील पाहणी आटोपून जळगाव जिल्ह्यात दाखल होणार होणार होती मात्र मालेगाव येथेच विलंब लागल्याने समितीचा दौरा लांबला. पारोळा येथे पोहचता पोहचता सायंकाळ झाल्याने मोंढाळे येथील पाहणी नावापुरता अंधारातच झाली तर इतर सर्व ठिकाणी पाहणी न करताच अधिकारी रवाना झाले. यामुळे प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.पारोळा तालुक्यातील मोंढाळे, करंजी बुद्रुक, सावखेडे मराठे तसेच एरंडोल तालुक्यातील भालगाव, एरंडोल, पिंपळकोठा या गावांना समिती शुक्रवारी भेट देणार होती. पैकी मोंढाळे येथेच एका शेतात पाहणी केली.या केंद्रीय पथकात केंद्रीय अर्थमंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ व जयपुर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा, नाश्किा विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, प्रांतअधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, प्रभारी कृषी अधिकारी सुरेश खेताडे व कृषीसहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.यावेळी मोंढाळे प्र अ.येथील शेतकरी भाऊलाल विठ्ठल पाटील यांचे कपाशी शेताताचे नुकसान न पाहता केंद्रीय समितीने हिरमोड केला.केंद्रीय पथक हे आपल्या आठ ते दहा गाड्यांचा ताफा घेऊन आले. सुटाबुटात आलेले अधिकारी यांनी नावाला एकच प्रातिनिधीक स्वरुपात म्हणणे ऐकुन महामार्गावर काढता पाय घेतला. अनेक शेतऱ्यांना आपल्या व्यथा मांडायच्या होत्या परंतु या पथकाने लक्ष दिले नाही.यावेळी मोंढाळे प्र अ सरपंच महारु पाटोळे , नंदलाल पाटील, सुधाकर पाटील, बळीराम पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, नंदू पाटील, विठ्ठल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान भेटच न दिल्याने करंजी येथील नुकसान ग्रस्त शेतकरी रविंद्र रामचंद्र पाटील,गोरख माळी व सावरखेड मराठ येथील शेतकरी राधेश्याम तोताराम नारायणी यांच्या पदरी घोर निराशा पडली.एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यावर तसेच एरंडोल नजीक अंजनी धरण फाट्यावर व पिंपळकोठा या तीन ठिकाणी केंद्रीय पथक पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार होते परंतु पथक या तिन्ही ठिकाणी न थांबता सरळ राष्ट्रीय महामार्गाने निघून गेल्यामुळे शेतकºयांची मोठी निराशा झाली. संध्याकाळी सव्वासात वाजता पथकाच्या वाहनांचा ताफा भालगाव फाट्यावरुन सरळ निघून गेला त्यावेळी त्याठिकाणी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलीस निरीक्षक अरुण हजारे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी एस.टी. पाटील व शेळगावकर, महसूल मंडळ अधिकारी एस. आर. महाले कृषी सहाय्यक महाजन, तलाठी ठोंबरे व सुमारे ५० शेतकरी केंद्रीय पथकाची प्रतीक्षा करीत थांबले होते. तसेच भालगाव येथील घनश्याम बिर्ला यांच्या कपाशीच्या शेतावर पथक येणार असल्यामुळे तेथेही अनेक शेतकरी थांबले होते. पथक आमच्याशी संवाद साधेल व आमची व्यथा ऐकून घेईल या आशेवर थांबलेले शेतकरी निराश झाले. एरंडोल येथे गोदावरीबाई परदेशी यांच्या शेतात ज्वारी पिकाचे व पिंपळकोठा येथे नलिनी रघुवंशी यांच्या शेतात ज्वारी पिकाची केंद्रीय पथक पाहणी करणार होते.पाहणी न करता अहवला देणार कसा ?मोंढाळे येथे सायंकाळी साडेसहा वाजता पथक आले. यावेळी पथकाने शेतात प्रत्यक्ष पाहणी न करता रस्त्यावरच शेतकºयांची विचारपूस करीत अवघ्या तीन तीन -चार मिनिटांची धावती भेट घेतल्याने केंद्रीय पथक नेमका तालुक्याचा बाबतीत कसा अहवाल देणार हा याबाबत शेतकरी चिंतातुर अवस्थेत दिसुन आले.