शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 18:28 IST

Burning Car : शॉर्ट सर्कीटमुळे घेतला पेट

ठळक मुद्देरस्त्याच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा ख‌ोळंबा झाला होता. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.

जळगाव : सिग्नलवर थांबलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर आकाशवाणी चौकात घडली. कारमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वालांमुळे प्रचंड पळापळ व धावपळ उडाली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील चौघे जण बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वाहतूक पोलीस, नागरीक व अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी कार विझविण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा ख‌ोळंबा झाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील आशिष मिलिंद तायडे (वय २२) हा  मित्र दिपक अडकमोल, पवन अडकमोल व गोपाल राक्षे यांच्यासोबत कारने (क्र.जी.जे.०५  सी.एच.९४४९) बुधवारी सकाळी जळगावात आला होता. अजिंठा चौफुली येथून काम आटोपून दुपारी २ वाजेच्या सुमारास ते पुन्हा कासोदा येथे घराकडे जाण्यासाठी निघाले. अडीच वाजता ते अजिंठा चौफुली येथे पोहचले. सिग्नल नसल्याने त्यांनी कार थांबविली. यावेळी कारमधून धुर निघत असल्याचे अशिषसह  मित्रांच्या लक्षात आले. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी चौघेही कारमधून बाहेर उतरले. पाहणी केली असता, कारच्या खाली शॉर्टसर्किटने झाल्याचे दिसून आले. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.

अग्निचा भडका अन‌् पळापळकारमधून अग्निचा भडका उडाल्यानंतर चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविला. त्यानुसार गोलाणी मार्केट येथून अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन बंब घटनास्थळावर पोहचला. अग्निशमन विभागाचे युसुफ पटेल, देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गंगारधर कोळी, राजेंद्र चौधरी, सोपान जाधव या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. रस्त्याच्या मधोमध कार जळाल्याने तसेच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहर वाहतूक शाखेचे साहेबराव कोळी, किरण मराठे, गणेश पाटील, बारसू नारखेडे, फिरोज तडवी, मोहनीन पठाण या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खाक झालेली कार रस्त्याच्या बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन विभागाचे प्रकाश चव्हाण यांनी घटनेची नोंद केली आहे.

 

टॅग्स :fireआगtraffic policeवाहतूक पोलीसJalgaonजळगावcarकार