शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन न झाल्यामुळे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला ‘ब्रेक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:16 IST

जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे ...

जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे कामच न झाल्यामुळे तिसºया लाईनच्या काम थांबले असल्याचे समोर आले आहे. सध्या याठिकाणी फक्त रेल्वेच्या हद्दीतच काम सुरु असून, भूसंपादना बाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे २७ नोव्हेंबरला बैठक आहे.भुसावळ ते भादली या तिसºया रेल्वे लाईनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी जळगाव ते मनमाड दरम्यान तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली होती. सुरुवातीपासूनच हे काम युद्ध पातळीवर सुुरु केले होते. मात्र, या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी घेत आहेत. त्या शेतकºयांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे.२७ नोव्हेंबरला मुख्य सचिवांकडे बैठकआधीच विलंब झालेल्या जळगाव ते मनमाड या तिसºया लाईनच्या कामाला पुन्हा भूसंपादनामुळे विलंब होत आहे. या संदर्भात रेल्वे अधिकाºयांनी रेल्वे मंत्रालयाला होणाºया विलंबाबाबत कळविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे या संदर्भात २७ नोव्हेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी व भुसावळ विभागातील रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव