शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
3
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
4
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
5
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
6
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
7
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
8
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
9
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
10
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
11
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
12
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
13
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
14
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
15
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
16
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
17
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
18
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
19
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
20
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण आणि त्या संदर्भातील राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. राज्य सरकारलादेखील त्याची माहिती आहे. मात्र १२ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाचे गठन करण्यास सांगितले होते. त्यासाठी ओबीसी समाजाची माहिती जमा करून न्यायालयात सादर करायची होती. त्याला १५ महिने झाले तरी राज्य सरकारने अजून आयोगाचे गठन केले नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मात्र तरीही अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात आली.

यावेळी भाजपचे आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ॲड. संजय महाजन, जयेश भावसार, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन आणि आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली.

कोरोनाचे नियम पायदळी

जिल्ह्यात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबतच पाच जणांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असले तरी भारतीय जनता पार्टीचे २० ते २५ कार्यकर्ते हे निवेदन देण्यासाठी गेले होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतानादेखील १० पेक्षा जास्त नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मागासवर्गीय आयोग गठीत करण्याची मागणी

राज्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी समाजाची माहिती संकलित करून राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात यावा, अशी मागणी देखील भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक बाबी पुर्ण न केल्याने ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात ५२ टक्के पेक्षा जास्त ओबीसी आहेत. त्यांना राजकीय आरक्षण मिळालेले नाही. मराठा समाजाच्या बाबतीतही सरकारने दुटप्पी भुमिका घेतली. सरकार अशीच भुमिका घेत असेल तर भविष्यात ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल.

- गिरीश महाजन, भाजप नेते.